शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

‘इंदिरा’ उठावानंतर जातीय राजकारणाला वाढता पाठिंबा’

By admin | Updated: April 23, 2016 01:19 IST

औरंगाबाद : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘इंदिरा गांधी उठावानंतर’ या देशातील राजकारणात जातीयवादी पक्षांचा शिरकाव झाला आणि या जातीय राजकारणाला पाठिंबा मिळत गेला.

औरंगाबाद : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘इंदिरा गांधी उठावानंतर’ या देशातील राजकारणात जातीयवादी पक्षांचा शिरकाव झाला आणि या जातीय राजकारणाला पाठिंबा मिळत गेला. आता तर हे राजकारण या देशात राज्यघटना वगैरे काही आहे याची पर्वा न करता सुरू आहे. ‘मनुस्मृती’ प्रमाण मानून सुरू असलेले हे राजकारण देशाला फॅसिझमकडे नेत आहे, असा स्पष्ट आरोप आज येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी केला. मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात अ‍ॅड. भगवानराव देशपांडेलिखित ‘विचारमंथन’ या ग्रंथाच्या विमोचनप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांनी या ग्रंथाच्या अनुषंगाने जगभरातील बदलांचा वेध घेत भाष्य केले. सावंत म्हणाले की, हिटलर हाच यांचा नायक आहे. तोच मार्ग पत्करून या देशात फॅसिझम आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माच्या मार्गाने फॅसिझम येईल, असे भाकीत पं. नेहरू यांनी केले होते. ते इतक्या लवकर येईल, असे वाटले नव्हते. दुर्दैवाने या फॅसिझमचा मुकाबला करण्यासाठी आशास्थान नाही. डाव्या चळवळीतील मंडळी भांडवलशाहीचे गोडवे गात आहे. विरोधी शक्तीला आज नेतृत्व नाही. कन्हैयाच्या रूपाने तरुणांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. अमेरिकेतसुद्धा लोकशाही नाही. तेथील लोकशाहीचे रूपांतर धनिकशाहीत झाले आहे. भारतातसुद्धा ८२ टक्के खासदार धनिक आहेत. १८२ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. म्हणजे निवडून येण्यासाठी एकतर धनिक असावे लागते, नाही तर गुंड असावे लागते, असाच याचा अर्थ झाला. मागच्या लोकसभा निवडणुकीत २३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.राज्यसभा तर श्रीमंतांचा क्लब (अड्डा) झाला आहे. नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशी पळून गेलेला विजय मल्ल्या हा राज्यसभेचा सदस्य आहे, याकडे सावंत यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. भालचंद्र कांगो, जयश्री गायकवाड, उदय बोपशेट्टी, उषा देशपांडे, कॉ. प्रकाश बनसोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जयश्री सावंत, शारदा साठे यांची मंचावर उपस्थिती होती. अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कॉ. राम बाहेती यांनी सूत्रसंचालन केले, तर कॉ. भास्कर लहाने यांनी आभार मानले.सरकारला धर्मनिरपेक्षता मान्य नाही...आमचे संविधान म्हणजे लोकशाही, समाजवाद निर्माण करण्याचा जाहीरनामा होय आणि हा जाहीरनामा सर्वांवर बंधनकारक आहे. लोकशाही टिकविण्यासाठी जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, असा भेदाभेद चालत नाही. आजच्या सरकारला समाजवाद व धर्मनिरपेक्षता मान्यच नाही. देशात घटनाच नाही या पद्धतीने ते कारभार करीत आहेत. घटनेची पायमल्ली करूनच महाराष्ट्रातील सरकार कारभार करीत आहे. आवाजी मतदानाने कधीही विश्वासदर्शक ठराव संमत होत नसतो. या सरकारने अजूनही कायद्याच्या चौकटीत राहून विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला नाही. केंद्र सरकारच्या व्यापारी व संरक्षण करारांमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत आहे. ४भारत देश भांडवलशाही अमेरिकेची वसाहत बनत आहे. हा देश फक्त एका धर्मीयांचा आहे असे ‘यांना’ वाटत आहे. त्यामुळे इतर धर्मीयांवर हल्ले वाढले आहेत, असेही यावेळी पी. बी. सावंत यांनी नमूद केले.