शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

रूई-कल्हाळी रस्त्याचे काम उद्घाटनानंतर ठप्पच

By admin | Updated: April 18, 2016 00:42 IST

नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़

नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़ रोहयोची कामे मागणी करूनही सुरू झाली नसून इ- मस्टरही दिले जात नाही़ जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी केलेल्या पाहणीत दुष्काळी परिस्थितीतही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे़ मराठवाडा जनता विकास परिषद आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने कंधार तालुक्यातील, पानभोसी, बहाद्दरपुरा, फुलवळ, कळका, कल्लाळी आदी गावांमध्ये भेटी देवून माहिती घेण्यात आली़ उपरोक्त गावात मजुरांच्या मागणीनंतरही मनरेगांची कामे सुरू झाली नाहीत़ अंबुलगा येथील नाला खोलीकरणाचे कामही थातूरमातूर करण्यात आले आहे़ त्याचवेळी अर्धवट केटीवेअरच्या कामामुळे दलित वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे़ मन्याड नदीत बहाद्दरपुऱ्याजवळ बंधारा उभारण्याची तसेच कंधार येथील जगतुंग समुद्रातील काळ काढून पाणीप्रश्न सोडविता येवू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले़ बारूळ धरणातही मृत जलसाठाच शिल्लक असल्याने पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ कल्लाळीतील परिस्थितीबाबतही संस्थांनी चिंता व्यक्त केली असून हैदराबाद मुक्तिसंग्रामात २५ हुतात्मे या गावचे झाले आहेत़ तेथे असलेल्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे़ प्रशासनाने याबाबीची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ या दुष्काळदौऱ्यात माजी खा़ व्यंकटेश काब्दे, प्रा़ नाना शिंदे, भगीरथ शुक्ला, डॉ. किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, बळवंत मोरे, एऩ जी़ पटणे, भाऊ मोरे, दिगांबर पेटकर आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)