शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सुटीनंतरही तहसीलदारांचे दालन कुलूपबंदच

By admin | Updated: July 29, 2015 00:47 IST

प्रकाश मिरगे , जाफराबाद तहसील कार्यालयाला गेली तीन दिवस शासकीय सुटी मिळून विश्रांती घेतल्यानंतरही चौथ्या दिवशी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या दालनाला कुलूप असल्याने

 

प्रकाश मिरगे , जाफराबाद

तहसील कार्यालयाला गेली तीन दिवस शासकीय सुटी मिळून विश्रांती घेतल्यानंतरही चौथ्या दिवशी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या दालनाला कुलूप असल्याने कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी, विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरशेनमध्ये उघडकीस आले. गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण असताना शेतकरी दुष्काळी अनुदान, पीकविमा, जातीच्या व उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी पालक, विद्यार्थी तहसील कार्यालयात चकरा मायन थकला आहे. तरी सुद्धा प्रशासन या विषयी गांभिर्याने घेत नाही. जबाबदार अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. शेतकरी, विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार मंगळवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयास भेट दिली असता, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल यांच्या दालनाला चक्क कुलूप लावण्यात आल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर चौथ्या दिवशी कार्यालय सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत कार्यालयातील प्रमुख कोणतेही लेखी स्वरूपात कार्यक्रम नसताना किंवा सहकारी कर्मचाऱ्यांना माहिती न देता कार्यालयीन कर्मचारी विविध समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना कारणे सांगून थकले आहे. पाऊसपाणी समाधानकारक नसल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे एका कामाकरीता किती दिवस चकरा मारायच्या हा मोठा प्रश्न आहे. शासन शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान पीक विमा अनुदान, मजुरांच्या हाताला काम नाही, या मागणीसाठी येवता, नळविहरा या गावातील मजुरांनी काम उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शासनाने पाणीटंचाईबाबत ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, तहसीलकडून याविषयी काही कारवाई होत नाही. विद्यार्थी जात प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही म्हणून त्यांचे शैक्षणिक नुकसानीस कोण जबाबदार, शेती विषयी असलेले शेतकऱ्यांचे वाद यांच्या तारखा देण्यात आल्या आहेत. शासनाने नवीन मागणी केलेले वाळू घाटाचे प्रश्न तसेच पडून आहेत. दुसरीकडे वाळूचोरी सर्रास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत वाळूचोरीचे नियोजन मात्र बरोबर सुरू आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तालुक्यात कामे बंद आहेत. शेतकरी पीक विमा भरण्यासाी आर्थिक अडचणीत आहे. अशा स्थितीमध्ये आर्थिक मदतीची रक्कम खाती पडून आहे. आदी समस्या असताना तहसीलदारसारखे अधिकारी मुख्यालयात थांबत नाही, या बाबीकडे शासन नियुक्त लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.