शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मार्चनंतर शेतकऱ्यांची कापणार वीज

By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST

नजीर शेख, औरंगाबाद मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार के ला आहे.

नजीर शेख, औरंगाबादसत्तेत नसताना शेतकऱ्यांचे कृषी बिल पूर्णपणे माफ करा म्हणणाऱ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी मार्चपर्यंत कृषी वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देऊन मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार के ला आहे. राज्याचे नवे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे मार्चनंतर कृषी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीनंतरही शेतकऱ्यांना कृषी वीज बिल माफ केले जाणार नाही; मात्र थकबाकी असली तरी वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती दिली जाईल, तसेच वीज बिल भरताना ३३ टक्के सवलतही दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फ डणवीस यांनी औरंगाबादेत मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर मोर्चा काढून शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज आणि कृषी वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली होती; मात्र आता सत्तेत आल्यावर त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.कृषी विजेचे कनेक्शन कापणार नसल्याचे याआधी शासनाने जाहीर करून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ऊर्जामंत्र्यांनी विज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांना मार्चनंतर विजेचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. राज्यामध्ये मराठवाड्यात दुष्काळाचे तीव्र संकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना एकीकडे बँकांनी व्याज भरण्याचा तगादा लावला आहे. अनेक शेतकरी पीक वाया गेल्याने कर्ज तर दूरच राहिले व्याजही भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांकडे जूनपासून किंवा काहींकडे गारपीट झाल्यानंतर फे ब्रुवारी महिन्यापासूनचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना आता आगामी खरीप हंगाम चांगला गेल्यासच काही प्रमाणात कर्जफेड किंवा वीज बिल भरणे शक्य होणार आहे. ही परिस्थिती राज्य सरकारमधील मंत्री, तसेच सत्तारूढ आमदारांनाही चांगली माहीत आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखविण्याचे शासनाचे धोरण दिसत नसून उलट त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.