शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

मार्चनंतर शेतकऱ्यांची कापणार वीज

By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST

नजीर शेख, औरंगाबाद मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार के ला आहे.

नजीर शेख, औरंगाबादसत्तेत नसताना शेतकऱ्यांचे कृषी बिल पूर्णपणे माफ करा म्हणणाऱ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी मार्चपर्यंत कृषी वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देऊन मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार के ला आहे. राज्याचे नवे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे मार्चनंतर कृषी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीनंतरही शेतकऱ्यांना कृषी वीज बिल माफ केले जाणार नाही; मात्र थकबाकी असली तरी वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती दिली जाईल, तसेच वीज बिल भरताना ३३ टक्के सवलतही दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फ डणवीस यांनी औरंगाबादेत मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर मोर्चा काढून शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज आणि कृषी वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली होती; मात्र आता सत्तेत आल्यावर त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.कृषी विजेचे कनेक्शन कापणार नसल्याचे याआधी शासनाने जाहीर करून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ऊर्जामंत्र्यांनी विज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांना मार्चनंतर विजेचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. राज्यामध्ये मराठवाड्यात दुष्काळाचे तीव्र संकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना एकीकडे बँकांनी व्याज भरण्याचा तगादा लावला आहे. अनेक शेतकरी पीक वाया गेल्याने कर्ज तर दूरच राहिले व्याजही भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांकडे जूनपासून किंवा काहींकडे गारपीट झाल्यानंतर फे ब्रुवारी महिन्यापासूनचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना आता आगामी खरीप हंगाम चांगला गेल्यासच काही प्रमाणात कर्जफेड किंवा वीज बिल भरणे शक्य होणार आहे. ही परिस्थिती राज्य सरकारमधील मंत्री, तसेच सत्तारूढ आमदारांनाही चांगली माहीत आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखविण्याचे शासनाचे धोरण दिसत नसून उलट त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.