शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भांडणानंतर पती मुलाचा मृतदेह घेऊन परतला

By admin | Updated: October 12, 2016 01:17 IST

लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद): पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पोटच्या चार वर्षांच्या मुलाला देवदर्शन करण्यासाठी घेऊन घराबाहेर पडलेला पती काही तासांनंतर

लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद): पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पोटच्या चार वर्षांच्या मुलाला देवदर्शन करण्यासाठी घेऊन घराबाहेर पडलेला पती काही तासांनंतर परतला तो रेल्वेखाली चिरडून मृत झालेल्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह घेऊनच. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी मध्यरात्री अकरा वाजेदरम्यान गंगापूर तालुक्यातील भानवाडी शिवारात घडली. मुलाचा खून झाला की, अपघात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.मधुकर दगडू वानखेडे (२८) हा पत्नी पुष्पा (२५) मुलगी रूपाली (६) व मुलगा ओम (४) यांच्यासोबत भानवाडी येथे राहतो. मधुकर दारूच्या नशेत पुष्पाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत सतत भांडण करीत असे. सोमवारीदेखील मधुकरने पुष्पासोबत भांडण केले. त्यानंतर रागाच्या भरात मुलगा ओम यास देवी दाक्षायणी मातेचे दर्शन करून आणतो असे म्हणून घराबाहेर घेऊन गेला.त्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मधुकर घरी एकटाच परतला. पत्नीने मुलगा कुठे आहे अशी विचारणा करताच त्याने रेल्वे रूळावरून आम्ही घरी येताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या रेल्वेमुळे मी गडबडलो व ओम रेल्वेखाली पडल्याचे सांगितले. यानंतर पुष्पाने तात्काळ लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली. जमादार अशोक गंगावणे यांना ग्रामस्थांनी रेल्वे रूळावर मुलगा मृत झाल्याची माहिती दिली.यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बरडे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपनिरीक्षक संदीप काळे, प्रशांत मुंडे, युनूस शेख, (पान २ वर)मधुकर व पुष्पाचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडणे होऊ लागली होती. त्यामुळे मधुकर पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता. ४सोमवारी रात्री झालेल्या भांडणानंतर दारूच्या नशेत मधुकर ओमला घेऊन रेल्वे रूळावरून जात होता. तेवढ्यात मनमाडकडून येणाऱ्या रेल्वेमुळे तो गडबडला व त्याच्या कडेवरील मुलगा खाली पडून रेल्वेखाली चिरडल्या गेला, असे शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.दरम्यान, पत्नीसोबतच्या भांडणाचा राग म्हणून मधुकरने ओमचा खून केला की खरोखर अपघात झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. खरा प्रकार काय आहे, हे तपासानंतरच कळणार आहे; पण पोटचा गोळा गेल्याने माता हंबरडा फोडताना पाहून अनेकांचे हृदय हेलावले.