शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

अकरा दिवसानंतरही खुनाचे कारण अस्पष्टच

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळेच दहा दिवस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विलासकडून खुनामागचे नेमके कारण व इतर माहिती काढून घेण्यास पोलिसांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. सुमित्रा होंडे यांची अंबड शहरातील राहत्या घरी पती सतीश होंडे यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. याचबरोबर त्यांनी घटनेच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले. तपासाला गती मिळावी यासाठी त्यांनी या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने यांच्याकडे सोपविला. मात्र, तपास कामातील दिरंगाईचा फायदा घेत विलास होंडे याने पोलिस कोठडी संपेपर्यंत खुनाचे नेमके कारण पोलिसांना कळू दिले नाही. १८ वर्षे ३ महिने वय असणाऱ्या व कोणत्याही गुन्ह्याचे रेकॉर्ड नसणाऱ्या विलास होंडेसारख्या महाविद्यालयीन युवकाकडून खुनाचे नेमके कारण काढून घेण्यात पोलिस अपयशी ठरल्याने आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. होंडे कुटुंबिय जिल्ह्यातील प्रतिष्ठितांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विलासने खुनाची कबुली दिल्यानंतर तो खुनाची दररोज वेगवेगळी कारणे सांगायचा. शिवाय सुमित्रा होंडे यांचा नियोजनबध्द पध्दतीने केलेला खून एकटा विलास करु शकत नाही. याकामी त्याला नक्कीच आणखी कोणाचे तरी सहकार्य असले पाहिजे, असे मुद्दे उपस्थित करीत पोलिसांनी विलास हा तपासात सहकार्य करीत नसल्याने त्याची नार्कोटेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही न्यायालयाकडे केली होती. मात्र, आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, भल्या-भल्यांना बोलते करणारे पोलिस विलास होंडे याच्या बाबतीतच कमी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)