शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अकरा दिवसानंतरही खुनाचे कारण अस्पष्टच

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळेच दहा दिवस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विलासकडून खुनामागचे नेमके कारण व इतर माहिती काढून घेण्यास पोलिसांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. सुमित्रा होंडे यांची अंबड शहरातील राहत्या घरी पती सतीश होंडे यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. याचबरोबर त्यांनी घटनेच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले. तपासाला गती मिळावी यासाठी त्यांनी या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने यांच्याकडे सोपविला. मात्र, तपास कामातील दिरंगाईचा फायदा घेत विलास होंडे याने पोलिस कोठडी संपेपर्यंत खुनाचे नेमके कारण पोलिसांना कळू दिले नाही. १८ वर्षे ३ महिने वय असणाऱ्या व कोणत्याही गुन्ह्याचे रेकॉर्ड नसणाऱ्या विलास होंडेसारख्या महाविद्यालयीन युवकाकडून खुनाचे नेमके कारण काढून घेण्यात पोलिस अपयशी ठरल्याने आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. होंडे कुटुंबिय जिल्ह्यातील प्रतिष्ठितांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विलासने खुनाची कबुली दिल्यानंतर तो खुनाची दररोज वेगवेगळी कारणे सांगायचा. शिवाय सुमित्रा होंडे यांचा नियोजनबध्द पध्दतीने केलेला खून एकटा विलास करु शकत नाही. याकामी त्याला नक्कीच आणखी कोणाचे तरी सहकार्य असले पाहिजे, असे मुद्दे उपस्थित करीत पोलिसांनी विलास हा तपासात सहकार्य करीत नसल्याने त्याची नार्कोटेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही न्यायालयाकडे केली होती. मात्र, आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, भल्या-भल्यांना बोलते करणारे पोलिस विलास होंडे याच्या बाबतीतच कमी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)