शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अकरा दिवसानंतरही खुनाचे कारण अस्पष्टच

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अंबड : सुमित्रा होंडे खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विलास होंडे याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळेच दहा दिवस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विलासकडून खुनामागचे नेमके कारण व इतर माहिती काढून घेण्यास पोलिसांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. सुमित्रा होंडे यांची अंबड शहरातील राहत्या घरी पती सतीश होंडे यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. याचबरोबर त्यांनी घटनेच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले. तपासाला गती मिळावी यासाठी त्यांनी या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने यांच्याकडे सोपविला. मात्र, तपास कामातील दिरंगाईचा फायदा घेत विलास होंडे याने पोलिस कोठडी संपेपर्यंत खुनाचे नेमके कारण पोलिसांना कळू दिले नाही. १८ वर्षे ३ महिने वय असणाऱ्या व कोणत्याही गुन्ह्याचे रेकॉर्ड नसणाऱ्या विलास होंडेसारख्या महाविद्यालयीन युवकाकडून खुनाचे नेमके कारण काढून घेण्यात पोलिस अपयशी ठरल्याने आता पोलिसांच्या कार्यपध्दतीवरतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. होंडे कुटुंबिय जिल्ह्यातील प्रतिष्ठितांपैकी एक असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विलासने खुनाची कबुली दिल्यानंतर तो खुनाची दररोज वेगवेगळी कारणे सांगायचा. शिवाय सुमित्रा होंडे यांचा नियोजनबध्द पध्दतीने केलेला खून एकटा विलास करु शकत नाही. याकामी त्याला नक्कीच आणखी कोणाचे तरी सहकार्य असले पाहिजे, असे मुद्दे उपस्थित करीत पोलिसांनी विलास हा तपासात सहकार्य करीत नसल्याने त्याची नार्कोटेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही न्यायालयाकडे केली होती. मात्र, आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून, भल्या-भल्यांना बोलते करणारे पोलिस विलास होंडे याच्या बाबतीतच कमी कसे पडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)