शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

...अखेर शिक्षकांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:59 IST

जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी अतिरिक्त (आगाऊ) वेतनवाढ २००९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाचे निमित्त करून अचानक बंद करण्यात आली होती. या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्देश २८ आॅगस्ट रोजी न्यायालयाने शासनाला दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी अतिरिक्त (आगाऊ) वेतनवाढ २००९ मध्ये सहाव्या वेतन आयोगाचे निमित्त करून अचानक बंद करण्यात आली होती. या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्देश २८ आॅगस्ट रोजी न्यायालयाने शासनाला दिला.जिल्ह्यातील ५० पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एप्रिल २०१७ रोजी अ‍ॅड. शिवकुमार मठपती यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. २८ आॅगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठासमोर न्यायमूर्ती एस.एस. केमकर आणि न्यायमूर्ती एन. डब्ल्यू सांबरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.सुनावणीवेळी १२ डिसेंबर २००० चे परिपत्रक अजूनही अस्तित्वात असून राज्य शासन व जिल्हा परिषदेचा उल्लेख जिल्हा शिक्षक पुरस्कार मंजुरी आदेशात करीत आहे. याचबरोबर राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना नागपूर व मुंबई खंडपीठाच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने २५ जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय काढून राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना २००५, २००६ ते २०१२- २०१३ पर्यंतच्या शिक्षकांना दोन वेतनवाढी दिल्या. त्यामुळे जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची वेतन वाढ बंद करणे चुकीचे असून त्यांच्यावर अन्याय होत असून त्या संबंधी शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. शिवकुमार मठपती यांनी केला. तसेच २००६ पासून २०१६-२०१७ पर्यंतच्या पुरस्कारप्राप्त याचिकाकर्त्यांची बाजू समक्षपणे न्यायालयासमोर मांडून त्यांना एक जादा वेतन वाढ देणे योग्य आहे, हे मांडले. यावेळी सुनावणीअंती याचिकाकर्त्या शिक्षकांचा प्रस्ताव हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वित्त विभाग आणि ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या सचिवाकडे पाठवावा आणि तो प्रस्ताव शासनाने १२ डिसेंबर २००० च्या परिपत्रकाच्या आधारे पुढील चार महिन्यात याचिकाकर्त्यांना एक आगाऊ वेतनवाढ द्यावी, असा निर्देश औरंगाबाद खंडपीठाने शासनाला दिला.जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष जिरवणकर पांडुरंग गिरी, संजय भक्कड, माधव वायचाळ, व्ही.डी. देशमुख, गौतम खडसे, पंडित अवचार, माधव घ्यार, विष्णू क्षीरसागर, नागोराव गडदे, किशन घोलप, मारोतराव कोटकर, बालाजी जुनघरे, विजय राठोड, जेनारायण राठोड, गजानन पायघन, रमेश काळे, अशोक देशमुख, ज्ञानबा मुसळे, रामभाऊ खिल्लारी, उत्तम वानखेडे आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.