शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

९९ दिवसांनंतर ग्रामीण अर्थकारणाची चाके फिरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:04 IST

औरंगाबाद: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच सुमारे ९९ दिवसांपासून ग्रामीण भागाचे ठप्प पडलेले अर्थकारण १९ जून सकाळी ७ वाजेपासून धावणार ...

औरंगाबाद: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच सुमारे ९९ दिवसांपासून ग्रामीण भागाचे ठप्प पडलेले अर्थकारण १९ जून सकाळी ७ वाजेपासून धावणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध ७ जून रोजी मागे घेण्यात आल्यानंतर १२ दिवसांनी ग्रामीण भाग शासनाच्या वर्गवारीनुसार पहिल्या स्तरात आल्यामुळे गावगाडा पूर्ववत रुळावर येणार आहे. जमावबंदी आणि संचारबंदी १९ जूनपासून मागे घेण्यात आली आहे.

७ जून रोजी ग्रामीण भाग तिसऱ्या स्तरात आल्याने काही कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, १९ जूनपासून सर्व निर्बंध संपले आहेत. पूर्णपणे नियमितपणे ग्रामीण भाग सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात विवाह सोहळे, सार्वजनिक सोहळे, मैदानावरील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व मैदानाच्या क्षमतेच्या ५० टक्के परवानगी असेल. अंत्यविधीसाठी १०० लोकांना परवानगी असेल. धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, स्विमिंग पूल बंद असतील. ७ जून रोजी लागू केलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल्सना परवानगी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून जिल्ह्यातील ग्रामीण भाग १९ जून पासून सुटणार आहे. ७ जून रोजी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ५.४६ टक्के तर २०.३४ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले होते. त्यामुळे जिल्ह्याची शासन नियमानुसार आलेली वर्गवारी तिसऱ्या स्तरावर होती. ही वर्गवारी आता पहिल्या स्तरात आली आहे. मॉल्स, चित्रपट, नाट्यगृहे, रेस्टाॅरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन केंद्र, उद्याने, मैदाने, खासगी आस्थापना नियमित वेळेत सुरू राहतील. बसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. कार्गाे सेवा पूर्णवेळ सुरू राहील. पाचव्या स्तरातील जिल्ह्यांतून प्रवासासाठी असलेले निर्बंध कायम आहेत.