शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

‘सिव्हिल’मध्ये ९ महिन्यांनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात ...

केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही

औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दाखल २९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नव्हता. गेल्या ९ महिन्यांत पहिल्यांदाच अशी स्थिती पहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी २०० खाटांची व्यवस्था केली होती. सप्टेंबरमध्ये या खाटाही अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे खाटांची संख्या ३०० पर्यंत वाढविण्यात आली. सप्टेंबरमध्ये रुग्णालयात २४ तासांत ऑक्सिजनचे १८० जम्बो सिलिंडर लागत होते. मात्र, ऑक्टोबरपासून काेरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. त्यातही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी होत गेली. जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आली होती. त्यात गुरुवारी दाखल एकाही रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली नाही. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर दिवसभरात रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर झाला नाही. रुग्णालयात पहिल्यांदाच एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

घाटीत ५२ रुग्ण गंभीर

घाटीत गुरुवारी दाखल गंभीर रुग्णांची संख्या ५२ होती. घाटीत रेफर होणाऱ्या रुग्णांमुळे गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्णांची संख्या ५० च्या जवळपास कायम रहात आहे.