शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

‘सिव्हिल’मध्ये ९ महिन्यांनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात ...

केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही

औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दाखल २९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नव्हता. गेल्या ९ महिन्यांत पहिल्यांदाच अशी स्थिती पहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी २०० खाटांची व्यवस्था केली होती. सप्टेंबरमध्ये या खाटाही अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे खाटांची संख्या ३०० पर्यंत वाढविण्यात आली. सप्टेंबरमध्ये रुग्णालयात २४ तासांत ऑक्सिजनचे १८० जम्बो सिलिंडर लागत होते. मात्र, ऑक्टोबरपासून काेरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. त्यातही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी होत गेली. जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आली होती. त्यात गुरुवारी दाखल एकाही रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली नाही. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर दिवसभरात रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर झाला नाही. रुग्णालयात पहिल्यांदाच एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

घाटीत ५२ रुग्ण गंभीर

घाटीत गुरुवारी दाखल गंभीर रुग्णांची संख्या ५२ होती. घाटीत रेफर होणाऱ्या रुग्णांमुळे गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्णांची संख्या ५० च्या जवळपास कायम रहात आहे.