शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

७ वर्षांनंतर बाजारपेठ सलग २ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:23 IST

जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.दोन दिवसांत शहरातील बाजारपेठेला सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. सलग दुसºया दिवशी (बुधवारी) प्रमुख बाजारपेठ संपूर्णपणे बंद राहिली. यात गुलमंडीपासून ते जाधववाडीपर्यंतचे व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे संपूर्ण शहरात रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. भाजीपाल्याची मुख्य अडत बाजारपेठ जाधववाडीत पहाटे अवघे १० ते १५ शेतकरीच शेतीमाल घेऊन आले होते. बंदमुळे किरकोळ विक्रेतेही जाधववाडीकडे फिरकले नाहीत.बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार जेथे ७० ते १०० टन फळे-भाजीपाल्याची आवक होते, तेथे आज केवळ ३० ते ४० क्विंटलच भाजीपाला विक्रीसाठी आला होता. अनेक अडत व्यापाºयांनी तर बुधवारी दुकानाचे शटरही उघडले नाही. धान्याचा अडत बाजार तर संपूर्णपणे बंदच होता. आज कोणत्याही धान्याची आवक झाली नाही, तसेच फळे घेऊन आलेले ट्रकही जाधववाडीत मुक्कामासाठी होते.जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, उद्या गुरुवारपासून शहरातील बाजारपेठ सुरळीत होतील. आता वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत येत आहे. यामुळे येत्या दिवसांत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या दृष्टीने व्यापारी तयारीला लागले आहे.४मोंढ्यातही अशीच परिस्थिती दिसून आली. येथील एकही दुकान आज उघडले नाही. शहराच्या हृदयस्थानी असलेले गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, टिळकपथ, मछलीखडक, कुंभारवाडा, सिटीचौक, सराफा रोड ही मुख्य बाजारपेठही संपूर्णपणे बंद होती; मात्र किराडपुरा ते बुढीलेनपर्यंतच्या भागात नेहमीप्रमाणे दुकाने सुरू होती.४यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष प्रफुल मालाणी यांनी सांगितले की, सात वर्षांच्या कालखंडानंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ सलग दोन दिवस बंद राहिली. २००९-२०१० मध्ये जकात हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने तेव्हा बाजारपेठ बंद पुकारला होता. त्यामुळे सलग चार दिवस बाजारपेठ बंद होती.४दोन वर्षांपूर्वी सराफा व्यापाºयांनी त्यांच्या मागणीसाठी बंद पुकारला होता. हा बंद तब्बल महिनाभर चालला; पण यात शहरातील सराफा व्यापारच बंद होता, तेव्हा अन्य बाजारपेठ सुरू होती. शहरात दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे व्यापाºयांनी मागील दोन दिवस आपले व्यवहार बंद ठेवले. यात शहराला ८० ते १०० कोटींचा आर्थिक फटका बसला.