शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
3
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
4
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
5
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
6
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
7
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
8
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
9
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
10
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
11
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
12
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
13
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
14
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
15
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
16
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
17
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
18
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
19
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
20
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांनंतर बाजारपेठ सलग २ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:23 IST

जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.दोन दिवसांत शहरातील बाजारपेठेला सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. सलग दुसºया दिवशी (बुधवारी) प्रमुख बाजारपेठ संपूर्णपणे बंद राहिली. यात गुलमंडीपासून ते जाधववाडीपर्यंतचे व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे संपूर्ण शहरात रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. भाजीपाल्याची मुख्य अडत बाजारपेठ जाधववाडीत पहाटे अवघे १० ते १५ शेतकरीच शेतीमाल घेऊन आले होते. बंदमुळे किरकोळ विक्रेतेही जाधववाडीकडे फिरकले नाहीत.बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार जेथे ७० ते १०० टन फळे-भाजीपाल्याची आवक होते, तेथे आज केवळ ३० ते ४० क्विंटलच भाजीपाला विक्रीसाठी आला होता. अनेक अडत व्यापाºयांनी तर बुधवारी दुकानाचे शटरही उघडले नाही. धान्याचा अडत बाजार तर संपूर्णपणे बंदच होता. आज कोणत्याही धान्याची आवक झाली नाही, तसेच फळे घेऊन आलेले ट्रकही जाधववाडीत मुक्कामासाठी होते.जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, उद्या गुरुवारपासून शहरातील बाजारपेठ सुरळीत होतील. आता वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत येत आहे. यामुळे येत्या दिवसांत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या दृष्टीने व्यापारी तयारीला लागले आहे.४मोंढ्यातही अशीच परिस्थिती दिसून आली. येथील एकही दुकान आज उघडले नाही. शहराच्या हृदयस्थानी असलेले गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, टिळकपथ, मछलीखडक, कुंभारवाडा, सिटीचौक, सराफा रोड ही मुख्य बाजारपेठही संपूर्णपणे बंद होती; मात्र किराडपुरा ते बुढीलेनपर्यंतच्या भागात नेहमीप्रमाणे दुकाने सुरू होती.४यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष प्रफुल मालाणी यांनी सांगितले की, सात वर्षांच्या कालखंडानंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ सलग दोन दिवस बंद राहिली. २००९-२०१० मध्ये जकात हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने तेव्हा बाजारपेठ बंद पुकारला होता. त्यामुळे सलग चार दिवस बाजारपेठ बंद होती.४दोन वर्षांपूर्वी सराफा व्यापाºयांनी त्यांच्या मागणीसाठी बंद पुकारला होता. हा बंद तब्बल महिनाभर चालला; पण यात शहरातील सराफा व्यापारच बंद होता, तेव्हा अन्य बाजारपेठ सुरू होती. शहरात दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे व्यापाºयांनी मागील दोन दिवस आपले व्यवहार बंद ठेवले. यात शहराला ८० ते १०० कोटींचा आर्थिक फटका बसला.