शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

७ वर्षांनंतर बाजारपेठ सलग २ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:23 IST

जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.दोन दिवसांत शहरातील बाजारपेठेला सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. सलग दुसºया दिवशी (बुधवारी) प्रमुख बाजारपेठ संपूर्णपणे बंद राहिली. यात गुलमंडीपासून ते जाधववाडीपर्यंतचे व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे संपूर्ण शहरात रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. भाजीपाल्याची मुख्य अडत बाजारपेठ जाधववाडीत पहाटे अवघे १० ते १५ शेतकरीच शेतीमाल घेऊन आले होते. बंदमुळे किरकोळ विक्रेतेही जाधववाडीकडे फिरकले नाहीत.बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार जेथे ७० ते १०० टन फळे-भाजीपाल्याची आवक होते, तेथे आज केवळ ३० ते ४० क्विंटलच भाजीपाला विक्रीसाठी आला होता. अनेक अडत व्यापाºयांनी तर बुधवारी दुकानाचे शटरही उघडले नाही. धान्याचा अडत बाजार तर संपूर्णपणे बंदच होता. आज कोणत्याही धान्याची आवक झाली नाही, तसेच फळे घेऊन आलेले ट्रकही जाधववाडीत मुक्कामासाठी होते.जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, उद्या गुरुवारपासून शहरातील बाजारपेठ सुरळीत होतील. आता वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत येत आहे. यामुळे येत्या दिवसांत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या दृष्टीने व्यापारी तयारीला लागले आहे.४मोंढ्यातही अशीच परिस्थिती दिसून आली. येथील एकही दुकान आज उघडले नाही. शहराच्या हृदयस्थानी असलेले गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, टिळकपथ, मछलीखडक, कुंभारवाडा, सिटीचौक, सराफा रोड ही मुख्य बाजारपेठही संपूर्णपणे बंद होती; मात्र किराडपुरा ते बुढीलेनपर्यंतच्या भागात नेहमीप्रमाणे दुकाने सुरू होती.४यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष प्रफुल मालाणी यांनी सांगितले की, सात वर्षांच्या कालखंडानंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ सलग दोन दिवस बंद राहिली. २००९-२०१० मध्ये जकात हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने तेव्हा बाजारपेठ बंद पुकारला होता. त्यामुळे सलग चार दिवस बाजारपेठ बंद होती.४दोन वर्षांपूर्वी सराफा व्यापाºयांनी त्यांच्या मागणीसाठी बंद पुकारला होता. हा बंद तब्बल महिनाभर चालला; पण यात शहरातील सराफा व्यापारच बंद होता, तेव्हा अन्य बाजारपेठ सुरू होती. शहरात दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे व्यापाºयांनी मागील दोन दिवस आपले व्यवहार बंद ठेवले. यात शहराला ८० ते १०० कोटींचा आर्थिक फटका बसला.