औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण घेताना महाविद्यालयाच्या परिसरात घालविलेला क्षण...अभ्यासाबरोबरच केलेल्या गमती-जमती सारे...सारे काही आठवले. जुन्या काळातील स्नेहबंधाची एकेक वीण हळुवारपणे उलगडत गेली. ४४ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ग भरला आणि वातावरण भारावून गेले. निमित्त होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘७२ भुले भटके ’ या कार्यक्रमाचा.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथून शिकून आणि डॉक्टर बनून बाहेर पडलेले १९७२ चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांची शनिवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भेट झाली. याप्रसंगी डॉ. ए. एस. दामले, मेडिसीन विभागप्रमुख डॉ.मंगला बोरकर, डॉ. भागवत कराड, डॉ. नघाटे, डॉ. सुरेंद्र जैस्वाल, डॉ. राजेंद्र करवा, डॉ. किशोर पारगावकर, डॉ. मृत्युंजय बिलगी, शिक्षक डॉ. आर. बी. भागवत, डॉ. तालीब, डॉ. व्ही. एल. देशपांडे, डॉ. अशोक रेगे, डॉ. खारकर, डॉ.मोहगावकर, डॉ. शिवाजी सुक्रे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त अनेक वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्याने प्रत्येक जण गळाभेट घेत होते. प्राध्यापकांचा आशीर्वाद घेत होते. ज्या वर्गात, ज्या बेंचवर बसून शिकलो होतो, त्याच ठिकाणी पुन्हा वर्ग भरला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
तब्बल ४४ वर्षांनंतर पुन्हा भरला वर्ग
By admin | Updated: May 10, 2016 00:54 IST