शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

३० तासांनंतर प्रहारचे आंदोलक उतरले जलकुंभावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, ...

औरंगाबाद : शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी दुपारपासून शिवाजीनगर जलकुंभावर प्रहार जनशक्ती पक्षाने सुरू केलेले आंदोलन आज सायंकाळी ६.३० वाजता तब्बल ३० तासांनंतर संपले. आंदोलन सुरू झाल्यापासून जलकुंभस्थळी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आणि अन्य मागण्यांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलक सुधाकर शिंदे यांनी दिली. यामुळे आंदोलन स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचे हस्तक असल्याचे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांनी गुरुवार दुपारपासून शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलकांनी जलकुंभावर दानवे यांचे दोन पुतळे जाळले. तेथे पडून असलेल्या प्लास्टिक टप आणि अन्य वस्तूही जाळल्या. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतरही गुरुवारी आंदोलन मागे घेतले नाही.

या कार्यकर्त्यांनी थंडीतही रात्री जलकुंभावर जेवण करून मुक्काम केला. पोलीस निरीक्षक पाटील, सपोनि. श्रद्धा वायदंडे, पोउपनि. भरत पाचोळे आणि कर्मचारी मदन, चव्हाण, दंडवते, अग्निशामकचे विजय राठोड, भगत आदींची उपस्थिती होती.

रात्रीतून उरले निम्मे आंदोलक

रात्री दहा ते पंधरा आंदोलक जलकुंभावरून उतरून निघून गेले. शुक्रवारी सकाळपासून १४ जणांनी पुन्हा घोषणा देत आंदोलन सुरू केले. दुपारी तहसीलदार दत्ता भारस्कर हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलकांनी पालकमंत्र्याची भेट मागितली. तहसीलदार दत्ता भारस्कर आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, आमच्या वरिष्ठांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले.

कॅप्शन ..

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जलकुंभावर निदर्शने करताना.