शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

३० तासांनंतर प्रहारचे आंदोलक उतरले जलकुंभावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, ...

औरंगाबाद : शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी दुपारपासून शिवाजीनगर जलकुंभावर प्रहार जनशक्ती पक्षाने सुरू केलेले आंदोलन आज सायंकाळी ६.३० वाजता तब्बल ३० तासांनंतर संपले. आंदोलन सुरू झाल्यापासून जलकुंभस्थळी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आणि अन्य मागण्यांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलक सुधाकर शिंदे यांनी दिली. यामुळे आंदोलन स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचे हस्तक असल्याचे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांनी गुरुवार दुपारपासून शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलकांनी जलकुंभावर दानवे यांचे दोन पुतळे जाळले. तेथे पडून असलेल्या प्लास्टिक टप आणि अन्य वस्तूही जाळल्या. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतरही गुरुवारी आंदोलन मागे घेतले नाही.

या कार्यकर्त्यांनी थंडीतही रात्री जलकुंभावर जेवण करून मुक्काम केला. पोलीस निरीक्षक पाटील, सपोनि. श्रद्धा वायदंडे, पोउपनि. भरत पाचोळे आणि कर्मचारी मदन, चव्हाण, दंडवते, अग्निशामकचे विजय राठोड, भगत आदींची उपस्थिती होती.

रात्रीतून उरले निम्मे आंदोलक

रात्री दहा ते पंधरा आंदोलक जलकुंभावरून उतरून निघून गेले. शुक्रवारी सकाळपासून १४ जणांनी पुन्हा घोषणा देत आंदोलन सुरू केले. दुपारी तहसीलदार दत्ता भारस्कर हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलकांनी पालकमंत्र्याची भेट मागितली. तहसीलदार दत्ता भारस्कर आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, आमच्या वरिष्ठांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले.

कॅप्शन ..

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जलकुंभावर निदर्शने करताना.