शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

२५ वर्षानंतर जलशुद्धीकरण झाले शुद्ध

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

जिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़ शुद्धीकरणाच्या हौदात दुर्गंधीयुक्त घाण, कीटक आणि गाळ निघाल्याने जिंतूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार होता, असे पालिकेच्या मोहिमेनंतर लक्षात आले़ या हौदातून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे़ २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र यापूर्वी कधीच साफ केले नव्हते़ शुद्धीकरण केंद्राच्या जवळपास फिरकणे देखील अशक्य ठरेल़, एवढी दुर्गंधी स्वच्छता करताना दिसून आली़ या केंद्रात मेलेल्या किड्यांचा वास, नालीतील घाणीसारखी घाण उपसण्यात आली आहे़ २५ ते ३० मजूर ही घाण साफ करीत होते़ पाण्याच्या हौदाला चारही बाजुंनी मृत कीटक व माशा दिसत होत्या़ नव्याने आलेले नगरअभियंता विनय आडसकर, मुख्याधिकारी जयंत सोनुने, नगराध्यक्ष फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, कपिल फारुखी, दलमीर पठाण, शाहीद बेग मिर्झा, दत्ता काळे, फिरोज कुरेशी, शेख इस्माईल यांच्यासह पाणीपुरवठा सभापती उस्मान खान पठाण हे दोन दिवसांपासून या अभियानात आहेत़ हा गाळ काढून संपूर्ण हौद, नलिका धुवून घेतल्या़ शहराला इतके दिवस अशुद्ध पाणी येत असल्यानेच साथीचे आजार बळावत असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे़ पालिकेने स्वच्छतेचे घेतलेले हे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे़