शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

२५ वर्षानंतर जलशुद्धीकरण झाले शुद्ध

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

जिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़ शुद्धीकरणाच्या हौदात दुर्गंधीयुक्त घाण, कीटक आणि गाळ निघाल्याने जिंतूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार होता, असे पालिकेच्या मोहिमेनंतर लक्षात आले़ या हौदातून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे़ २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र यापूर्वी कधीच साफ केले नव्हते़ शुद्धीकरण केंद्राच्या जवळपास फिरकणे देखील अशक्य ठरेल़, एवढी दुर्गंधी स्वच्छता करताना दिसून आली़ या केंद्रात मेलेल्या किड्यांचा वास, नालीतील घाणीसारखी घाण उपसण्यात आली आहे़ २५ ते ३० मजूर ही घाण साफ करीत होते़ पाण्याच्या हौदाला चारही बाजुंनी मृत कीटक व माशा दिसत होत्या़ नव्याने आलेले नगरअभियंता विनय आडसकर, मुख्याधिकारी जयंत सोनुने, नगराध्यक्ष फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, कपिल फारुखी, दलमीर पठाण, शाहीद बेग मिर्झा, दत्ता काळे, फिरोज कुरेशी, शेख इस्माईल यांच्यासह पाणीपुरवठा सभापती उस्मान खान पठाण हे दोन दिवसांपासून या अभियानात आहेत़ हा गाळ काढून संपूर्ण हौद, नलिका धुवून घेतल्या़ शहराला इतके दिवस अशुद्ध पाणी येत असल्यानेच साथीचे आजार बळावत असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे़ पालिकेने स्वच्छतेचे घेतलेले हे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे़