शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२५ वर्षानंतर जलशुद्धीकरण झाले शुद्ध

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

जिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़ शुद्धीकरणाच्या हौदात दुर्गंधीयुक्त घाण, कीटक आणि गाळ निघाल्याने जिंतूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार होता, असे पालिकेच्या मोहिमेनंतर लक्षात आले़ या हौदातून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे़ २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र यापूर्वी कधीच साफ केले नव्हते़ शुद्धीकरण केंद्राच्या जवळपास फिरकणे देखील अशक्य ठरेल़, एवढी दुर्गंधी स्वच्छता करताना दिसून आली़ या केंद्रात मेलेल्या किड्यांचा वास, नालीतील घाणीसारखी घाण उपसण्यात आली आहे़ २५ ते ३० मजूर ही घाण साफ करीत होते़ पाण्याच्या हौदाला चारही बाजुंनी मृत कीटक व माशा दिसत होत्या़ नव्याने आलेले नगरअभियंता विनय आडसकर, मुख्याधिकारी जयंत सोनुने, नगराध्यक्ष फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, कपिल फारुखी, दलमीर पठाण, शाहीद बेग मिर्झा, दत्ता काळे, फिरोज कुरेशी, शेख इस्माईल यांच्यासह पाणीपुरवठा सभापती उस्मान खान पठाण हे दोन दिवसांपासून या अभियानात आहेत़ हा गाळ काढून संपूर्ण हौद, नलिका धुवून घेतल्या़ शहराला इतके दिवस अशुद्ध पाणी येत असल्यानेच साथीचे आजार बळावत असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे़ पालिकेने स्वच्छतेचे घेतलेले हे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे़