शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रभाग रचनेचे फायदे कमी, तोटे जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला ...

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला तयार नाही. या निर्णयाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रशासनालाही प्रभागात काम करणे सोपे राहणार नाही. गरीब उमेदवार प्रभाग पद्धतीत निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळे प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मागणी आता जाेर धरत आहे.

शहरातील राजकीय मंडळींनी मागील अनेक वर्षांपासून एकच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. आता अचानक ३ वॉर्डांच्या प्रभागातून निवडणूक लढविणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने अवघड आहे. ३० हजार लोकसंख्येतून मते मिळविणे सहजासहजी शक्य नाही. पॅनलमधील दोन सहकारी उमेदवार कसे राहतील, यावर प्रत्येकाचे भवितव्य अवलंबून आहे. प्रभागातील विकास कामांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. निवडून आलेला एखादा उमेदवार वॉर्डाकडे दुर्लक्ष करीत असेल तर इतर दोन नगरसेवकांना त्या तिसऱ्या वॉर्डाची जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण तेथील नागरिकांनीही दोन्ही उमेदवारांना मतदान केलेले असते. म्हणूनच प्रभाग पद्धतीला विरोध सुरू झाला असून, पूर्वीप्रमाणे वॉर्डपद्धत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

काय म्हणतात जाणकार

नांदेड, परभणी आणि मालेगाव येथील मनपाच्या निवडणुकांमध्ये मी काम केले. प्रभाग पद्धत खूपच चांगली आहे. तुल्यबळ उमेदवार निवडून येतात. अपक्ष पराभूत होतात. काही मोठ्या पक्षांनाही याचा फटका बसतो. जास्तीत जास्त मतदारांमधून निवडून येण्याची क्षमता उमेदवारांमध्ये तयार होते. औरंगाबादेत ही पद्धती भविष्यात लागू होणार असेल तर स्वागतच म्हणावे लागेल.

तकी हसन खान, माजी उपहापौर

प्रभाग पद्धत माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीची आणि वाईट आहे. १० हजार लोकसंख्या असलेल्या वॉर्डातून निवडून येणे सहज शक्य होते. आता ३० हजार लोकसंख्येत निवडणूक लढवायची म्हटले तर वाईट आहे. भविष्यात विकास कामांचीही फारच पंचाईत असते. प्रभाग पद्धत बंद करून एकेरी वॉर्ड पद्धतच ठेवावी.

नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक