शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचे फायदे कमी, तोटे जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला ...

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला तयार नाही. या निर्णयाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रशासनालाही प्रभागात काम करणे सोपे राहणार नाही. गरीब उमेदवार प्रभाग पद्धतीत निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळे प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मागणी आता जाेर धरत आहे.

शहरातील राजकीय मंडळींनी मागील अनेक वर्षांपासून एकच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. आता अचानक ३ वॉर्डांच्या प्रभागातून निवडणूक लढविणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने अवघड आहे. ३० हजार लोकसंख्येतून मते मिळविणे सहजासहजी शक्य नाही. पॅनलमधील दोन सहकारी उमेदवार कसे राहतील, यावर प्रत्येकाचे भवितव्य अवलंबून आहे. प्रभागातील विकास कामांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. निवडून आलेला एखादा उमेदवार वॉर्डाकडे दुर्लक्ष करीत असेल तर इतर दोन नगरसेवकांना त्या तिसऱ्या वॉर्डाची जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण तेथील नागरिकांनीही दोन्ही उमेदवारांना मतदान केलेले असते. म्हणूनच प्रभाग पद्धतीला विरोध सुरू झाला असून, पूर्वीप्रमाणे वॉर्डपद्धत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

काय म्हणतात जाणकार

नांदेड, परभणी आणि मालेगाव येथील मनपाच्या निवडणुकांमध्ये मी काम केले. प्रभाग पद्धत खूपच चांगली आहे. तुल्यबळ उमेदवार निवडून येतात. अपक्ष पराभूत होतात. काही मोठ्या पक्षांनाही याचा फटका बसतो. जास्तीत जास्त मतदारांमधून निवडून येण्याची क्षमता उमेदवारांमध्ये तयार होते. औरंगाबादेत ही पद्धती भविष्यात लागू होणार असेल तर स्वागतच म्हणावे लागेल.

तकी हसन खान, माजी उपहापौर

प्रभाग पद्धत माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीची आणि वाईट आहे. १० हजार लोकसंख्या असलेल्या वॉर्डातून निवडून येणे सहज शक्य होते. आता ३० हजार लोकसंख्येत निवडणूक लढवायची म्हटले तर वाईट आहे. भविष्यात विकास कामांचीही फारच पंचाईत असते. प्रभाग पद्धत बंद करून एकेरी वॉर्ड पद्धतच ठेवावी.

नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक