शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

प्रभाग रचनेचे फायदे कमी, तोटे जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला ...

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला तयार नाही. या निर्णयाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रशासनालाही प्रभागात काम करणे सोपे राहणार नाही. गरीब उमेदवार प्रभाग पद्धतीत निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळे प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मागणी आता जाेर धरत आहे.

शहरातील राजकीय मंडळींनी मागील अनेक वर्षांपासून एकच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. आता अचानक ३ वॉर्डांच्या प्रभागातून निवडणूक लढविणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने अवघड आहे. ३० हजार लोकसंख्येतून मते मिळविणे सहजासहजी शक्य नाही. पॅनलमधील दोन सहकारी उमेदवार कसे राहतील, यावर प्रत्येकाचे भवितव्य अवलंबून आहे. प्रभागातील विकास कामांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. निवडून आलेला एखादा उमेदवार वॉर्डाकडे दुर्लक्ष करीत असेल तर इतर दोन नगरसेवकांना त्या तिसऱ्या वॉर्डाची जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण तेथील नागरिकांनीही दोन्ही उमेदवारांना मतदान केलेले असते. म्हणूनच प्रभाग पद्धतीला विरोध सुरू झाला असून, पूर्वीप्रमाणे वॉर्डपद्धत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

काय म्हणतात जाणकार

नांदेड, परभणी आणि मालेगाव येथील मनपाच्या निवडणुकांमध्ये मी काम केले. प्रभाग पद्धत खूपच चांगली आहे. तुल्यबळ उमेदवार निवडून येतात. अपक्ष पराभूत होतात. काही मोठ्या पक्षांनाही याचा फटका बसतो. जास्तीत जास्त मतदारांमधून निवडून येण्याची क्षमता उमेदवारांमध्ये तयार होते. औरंगाबादेत ही पद्धती भविष्यात लागू होणार असेल तर स्वागतच म्हणावे लागेल.

तकी हसन खान, माजी उपहापौर

प्रभाग पद्धत माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीची आणि वाईट आहे. १० हजार लोकसंख्या असलेल्या वॉर्डातून निवडून येणे सहज शक्य होते. आता ३० हजार लोकसंख्येत निवडणूक लढवायची म्हटले तर वाईट आहे. भविष्यात विकास कामांचीही फारच पंचाईत असते. प्रभाग पद्धत बंद करून एकेरी वॉर्ड पद्धतच ठेवावी.

नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक