शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रभाग रचनेचे फायदे कमी, तोटे जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला ...

औरंगाबाद : महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, पण सर्वच राजकीय पक्षांना हा निर्णय सहजासहजी पचायला तयार नाही. या निर्णयाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रशासनालाही प्रभागात काम करणे सोपे राहणार नाही. गरीब उमेदवार प्रभाग पद्धतीत निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळे प्रभाग पद्धत रद्द करावी अशी मागणी आता जाेर धरत आहे.

शहरातील राजकीय मंडळींनी मागील अनेक वर्षांपासून एकच वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. आता अचानक ३ वॉर्डांच्या प्रभागातून निवडणूक लढविणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने अवघड आहे. ३० हजार लोकसंख्येतून मते मिळविणे सहजासहजी शक्य नाही. पॅनलमधील दोन सहकारी उमेदवार कसे राहतील, यावर प्रत्येकाचे भवितव्य अवलंबून आहे. प्रभागातील विकास कामांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. निवडून आलेला एखादा उमेदवार वॉर्डाकडे दुर्लक्ष करीत असेल तर इतर दोन नगरसेवकांना त्या तिसऱ्या वॉर्डाची जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण तेथील नागरिकांनीही दोन्ही उमेदवारांना मतदान केलेले असते. म्हणूनच प्रभाग पद्धतीला विरोध सुरू झाला असून, पूर्वीप्रमाणे वॉर्डपद्धत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

काय म्हणतात जाणकार

नांदेड, परभणी आणि मालेगाव येथील मनपाच्या निवडणुकांमध्ये मी काम केले. प्रभाग पद्धत खूपच चांगली आहे. तुल्यबळ उमेदवार निवडून येतात. अपक्ष पराभूत होतात. काही मोठ्या पक्षांनाही याचा फटका बसतो. जास्तीत जास्त मतदारांमधून निवडून येण्याची क्षमता उमेदवारांमध्ये तयार होते. औरंगाबादेत ही पद्धती भविष्यात लागू होणार असेल तर स्वागतच म्हणावे लागेल.

तकी हसन खान, माजी उपहापौर

प्रभाग पद्धत माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीची आणि वाईट आहे. १० हजार लोकसंख्या असलेल्या वॉर्डातून निवडून येणे सहज शक्य होते. आता ३० हजार लोकसंख्येत निवडणूक लढवायची म्हटले तर वाईट आहे. भविष्यात विकास कामांचीही फारच पंचाईत असते. प्रभाग पद्धत बंद करून एकेरी वॉर्ड पद्धतच ठेवावी.

नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक