शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अधिकाऱ्यांना शाळा दिल्या दत्तक

By admin | Updated: January 15, 2016 23:33 IST

हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविताना शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.

हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविताना शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. त्यात आता मुख्य कार्यकारी अधिकारी शाळांच्या भेटी घेत असून उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभागासह इतर अधिकाऱ्यांना शाळा दत्तक दिल्या जात आहेत.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात प्रत्येक शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेऊन गुणवत्ता तपासली जात आहे. सदर उपक्रमाची अंमलबजावणी चोखपणे होण्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासणी होत आहे. विशेष म्हणजे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड शाळांच्या भेटी घेऊन उपक्रमाचा आढावा घेत आहेत. शिक्षकांना आवश्यक माहिती देत आहेत. शाळेतील एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याची काळजी घेत शिक्षण विभागाकडून तालुका व केंद्र स्तरावर प्रेरणा कार्यशाळा घेण्यात येत आहेत. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी किती प्रगत झाले आहेत, याची तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ज्ञानरचनावाद प्रणालीचा आधार घेतला जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यूडायएसप्रमाणे जिल्ह्यामध्ये जि. प. व खाजगी मिळून १२८६ शाळा आहेत.याबाबत शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांना विचारले असता, ते म्हणाले, प्र्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सर्व शाळा स्तरावर राबविल्या जात आहे. प्रथम भेटीत शाळेत उपक्रम पद्धती, दुसऱ्या भेटीत विद्यार्थ्यांची प्रगती, तर तिसऱ्या भेटीमध्ये आवश्यक सूचना व अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील ६० च्यावर शाळांना त्यांनी भेटी दिल्याचे ते म्हणाले.