शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अध्यक्षांच्या संमतीविना प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: August 27, 2014 00:15 IST

औरंगाबाद : वित्त विभागालाच नव्हे तर जलव्यवस्थापन समितीला डावलून अधिकाऱ्यांनी परस्परच सिंचन कामांची खिरापत वाटली आहे.

औरंगाबाद : वित्त विभागालाच नव्हे तर जलव्यवस्थापन समितीला डावलून अधिकाऱ्यांनी परस्परच सिंचन कामांची खिरापत वाटली आहे. विशेष म्हणजे जि.प. अध्यक्ष शारदा जारवाल यांनी विभागाला तसे पत्र दिल्यानंतरही काही सदस्यांची कामे राजरोसपणे मंजूर करण्यात आली आहेत. जारवाल यांनी सांगितले की, दि.१८ जून रोजी यासंदर्भातील पत्र सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सौंदनकर यांना देण्यात आले होते; परंतु त्यानंतर विभागाने अनेक कामांना परस्पर प्रशासकीय मंजुरी दिली. शासनाकडून मिळणाऱ्या निधीनुसार कामाचे नियोजन पदाधिकारी करीत असतात; परंतु सिंचन विभागाने सभागृह व पदाधिकाऱ्यांना डावलून स्वत:च बेकायदा कामे वाटली व प्रचंड दायित्व निर्माण करून ठेवले. अध्यक्षांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिंचन विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा उपकर व शासन अनुदानित योजनेवर होणाऱ्या सन २०१४-१५ च्या खर्चाचे नियोजन हे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीमध्येच करण्यात यावे. सिंचन विभागाने परस्पर निधीचे नियोजन केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी विभागप्रमुखाची राहील. या पत्राकडे विभागाने चक्क पाठ फिरवली आणि नव्याने अनेक कामे मंजूर केली. एवढेच नव्हे तर जलव्यवस्थापन आणि वित्त विभागाला डावलून दिलेल्या कामाची थेट बिलेच वित्त विभागात आता दाखल केली आहेत. चौघांच्या उपस्थितीत बैठकसिंचन विभागाने दिलेल्या २७ कोल्हापुरी बंधाऱ्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर जलव्यवस्थापन समितीची बैठक पाच सदस्य आंदोलन करून हाणून पाडत होते. अध्यक्ष, समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, महिला व बालकल्याण सभापती पूनम राजपूत व शिक्षण सभापती बबन कुंडारे या चौघांच्या उपस्थितीत मंगळवारी ही बैठक घेण्यात आली. ज्या १८ सदस्यांच्या गटात एकही काम झाले नाही त्यांना प्रत्येकी २ कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला.