शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो.

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो. पूर परिस्थितीसह इतर आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. तालुका निहायही समिती स्थापन असून, जिल्हा कक्ष चोवीस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. काही धोका होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासनानेही नियोजन केले आहे. जिल्ह्यास साठ किलोमीटरचा गोदाकाठ लाभला आहे. अंबड तालुक्यातील १३ गावे गोदाकाठावर वसलेली आहेत. यात प्रामुख्याने गोंदी, गांधारी, वाळकेश्वर, कुरण, गंगा चिंचोली, साष्टपिंपळगाव, बळेगाव, अपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रूक, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगावचा समावेश आहे.सध्यस्थितीत पुराचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २००६ मध्ये वरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदा तशी स्थिती नसली तर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. अंबड तालुक्यासोबतच भोकरदन तालुक्यातील धामणा, केळणा, रायघोळ नद्या वाहतात. यामुळे शेलूद, पारध व भोकरदन शहरातील झोपडपट्टी भाग पूरप्रवण क्षेत्रात येतो. येथील प्रशासनाकडून पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. जाफराबाद तालुक्यातील काळनदीमुळे कोनड, निमखेडा यांना पुराचा फटका बसू शकतो. परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकनपुरी, गंगाकिनारा, चांगतपुरी, सावरगाव बुद्रूक गोदावरीला विस्तीर्ण किनारा लाभला आहे. घनसावंगी तालुक्यातील भादली, सिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, रामसगाव, गुंज, बाणेगाव, सौंदलगाव, लिंगेवाडी, उक्कडगाव, जोगलादेवी, भोगाव, शेवता, कोठी, पांगरी या गावातून १७ गावांतून गोदावरी वाहते याभागाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या क्रमांक २३ व्या तुकडीने जालना जिल्हा दत्तक घेतला आहे. या तुकडीतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची पाहणी केली आहे. काही आपत्ती ओढावल्या सैन्य तुकडी तयार आहे. सातही दिवस चोवीस तास आपत्ती कक्ष सुरू राहणार असून, कक्षातील ०२४८२-२२३१३२ तसेच १०७७ टोल फ्री क्रमांक सुरू असल्याचे अधिकारी खान यांनी सांगितले.नदीपात्रात पाण्याची पातळी समजण्यासाठी धरणापासून ते शेवटपर्यंत खुणा करणे आवश्यक आहे. यात निळी खूण सर्वसाधारण पूर परिस्थिती तर लाल खूण ही धोक्याची सूचना देते. परंतु प्रशासनाकडून अशा खुणा करण्यात आलेल्या नाहीत.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. १०७७ हा टोल फ्री क्रमांक आहे. पूर परिस्थती झाल्यास दहा ते बारा नागरिक बसू शकतील अशा रबर बोट, हुड मास्क, हेल्मेटस, टेबल टॉवर, फोल्डेबल स्ट्रेचर, फायर सुट, फस्टऐड किट, आगरोधक यंत्र, लाईफ जॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.