शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो.

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो. पूर परिस्थितीसह इतर आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. तालुका निहायही समिती स्थापन असून, जिल्हा कक्ष चोवीस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. काही धोका होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासनानेही नियोजन केले आहे. जिल्ह्यास साठ किलोमीटरचा गोदाकाठ लाभला आहे. अंबड तालुक्यातील १३ गावे गोदाकाठावर वसलेली आहेत. यात प्रामुख्याने गोंदी, गांधारी, वाळकेश्वर, कुरण, गंगा चिंचोली, साष्टपिंपळगाव, बळेगाव, अपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रूक, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगावचा समावेश आहे.सध्यस्थितीत पुराचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २००६ मध्ये वरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदा तशी स्थिती नसली तर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. अंबड तालुक्यासोबतच भोकरदन तालुक्यातील धामणा, केळणा, रायघोळ नद्या वाहतात. यामुळे शेलूद, पारध व भोकरदन शहरातील झोपडपट्टी भाग पूरप्रवण क्षेत्रात येतो. येथील प्रशासनाकडून पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. जाफराबाद तालुक्यातील काळनदीमुळे कोनड, निमखेडा यांना पुराचा फटका बसू शकतो. परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकनपुरी, गंगाकिनारा, चांगतपुरी, सावरगाव बुद्रूक गोदावरीला विस्तीर्ण किनारा लाभला आहे. घनसावंगी तालुक्यातील भादली, सिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, रामसगाव, गुंज, बाणेगाव, सौंदलगाव, लिंगेवाडी, उक्कडगाव, जोगलादेवी, भोगाव, शेवता, कोठी, पांगरी या गावातून १७ गावांतून गोदावरी वाहते याभागाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या क्रमांक २३ व्या तुकडीने जालना जिल्हा दत्तक घेतला आहे. या तुकडीतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची पाहणी केली आहे. काही आपत्ती ओढावल्या सैन्य तुकडी तयार आहे. सातही दिवस चोवीस तास आपत्ती कक्ष सुरू राहणार असून, कक्षातील ०२४८२-२२३१३२ तसेच १०७७ टोल फ्री क्रमांक सुरू असल्याचे अधिकारी खान यांनी सांगितले.नदीपात्रात पाण्याची पातळी समजण्यासाठी धरणापासून ते शेवटपर्यंत खुणा करणे आवश्यक आहे. यात निळी खूण सर्वसाधारण पूर परिस्थिती तर लाल खूण ही धोक्याची सूचना देते. परंतु प्रशासनाकडून अशा खुणा करण्यात आलेल्या नाहीत.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. १०७७ हा टोल फ्री क्रमांक आहे. पूर परिस्थती झाल्यास दहा ते बारा नागरिक बसू शकतील अशा रबर बोट, हुड मास्क, हेल्मेटस, टेबल टॉवर, फोल्डेबल स्ट्रेचर, फायर सुट, फस्टऐड किट, आगरोधक यंत्र, लाईफ जॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.