शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

गोदाकाठावर प्रशासनाचा ‘वॉच’

By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो.

जालना/वडीगोद्री : नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरील नदीला पूर आला आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदाकाठच्या गावांनाही धोका होऊ शकतो. पूर परिस्थितीसह इतर आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. तालुका निहायही समिती स्थापन असून, जिल्हा कक्ष चोवीस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. काही धोका होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासनानेही नियोजन केले आहे. जिल्ह्यास साठ किलोमीटरचा गोदाकाठ लाभला आहे. अंबड तालुक्यातील १३ गावे गोदाकाठावर वसलेली आहेत. यात प्रामुख्याने गोंदी, गांधारी, वाळकेश्वर, कुरण, गंगा चिंचोली, साष्टपिंपळगाव, बळेगाव, अपेगाव, शहागड, पाथरवाला बुद्रूक, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव, साडेगावचा समावेश आहे.सध्यस्थितीत पुराचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २००६ मध्ये वरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदा तशी स्थिती नसली तर प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. अंबड तालुक्यासोबतच भोकरदन तालुक्यातील धामणा, केळणा, रायघोळ नद्या वाहतात. यामुळे शेलूद, पारध व भोकरदन शहरातील झोपडपट्टी भाग पूरप्रवण क्षेत्रात येतो. येथील प्रशासनाकडून पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. जाफराबाद तालुक्यातील काळनदीमुळे कोनड, निमखेडा यांना पुराचा फटका बसू शकतो. परतूर तालुक्यातील गोळेगाव, संकनपुरी, गंगाकिनारा, चांगतपुरी, सावरगाव बुद्रूक गोदावरीला विस्तीर्ण किनारा लाभला आहे. घनसावंगी तालुक्यातील भादली, सिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, रामसगाव, गुंज, बाणेगाव, सौंदलगाव, लिंगेवाडी, उक्कडगाव, जोगलादेवी, भोगाव, शेवता, कोठी, पांगरी या गावातून १७ गावांतून गोदावरी वाहते याभागाकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे असलेल्या भारतीय सैन्याच्या क्रमांक २३ व्या तुकडीने जालना जिल्हा दत्तक घेतला आहे. या तुकडीतील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची पाहणी केली आहे. काही आपत्ती ओढावल्या सैन्य तुकडी तयार आहे. सातही दिवस चोवीस तास आपत्ती कक्ष सुरू राहणार असून, कक्षातील ०२४८२-२२३१३२ तसेच १०७७ टोल फ्री क्रमांक सुरू असल्याचे अधिकारी खान यांनी सांगितले.नदीपात्रात पाण्याची पातळी समजण्यासाठी धरणापासून ते शेवटपर्यंत खुणा करणे आवश्यक आहे. यात निळी खूण सर्वसाधारण पूर परिस्थिती तर लाल खूण ही धोक्याची सूचना देते. परंतु प्रशासनाकडून अशा खुणा करण्यात आलेल्या नाहीत.जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. १०७७ हा टोल फ्री क्रमांक आहे. पूर परिस्थती झाल्यास दहा ते बारा नागरिक बसू शकतील अशा रबर बोट, हुड मास्क, हेल्मेटस, टेबल टॉवर, फोल्डेबल स्ट्रेचर, फायर सुट, फस्टऐड किट, आगरोधक यंत्र, लाईफ जॅकेटसचे वाटप करण्यात आले आहे.