शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बजाजनगरात गतीरोधक टाकण्याचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:25 IST

अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील मुख्य चौकात गतीरोधक उभारावेत अशी मागणी वाहनाधारकांतून केली जात आहे.

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरातील रस्ते गुळगुळीत केले आहेत. मात्र, या रस्त्यावर गतीरोधक तयार केले नाहीत. त्यामुळे वाहनधारक वाहने सुसाट पळवित आहेत. या भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत असून, हे रस्ते नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. या सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी व अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील मुख्य चौकात गतीरोधक उभारावेत अशी मागणी वाहनाधारकांतून केली जात आहे.

एमआयडीसी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन काही महिन्यांपूर्वीच बजाजनगर निवासी क्षेत्रातील रस्ते गुळगुळीत केले आहेत. पण या रस्त्यावर भरधाव वाहनांना ब्रेक लागण्यासाठी कुठेही गतीरोधक तयार केलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक या गुळगुळीत डांबरी रस्त्यावरुन वाहने सुसाट नेत आहेत. मद्यपी चालकांची संख्याही मोठी आहे.

उन्हाळी सुट्या लागल्याने यात अल्पवयीन चालकाची भर पडली आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना वाढत असून, किरकोळ अपघात तर रोजचे झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच येथील मोरे चौक, त्रिमूर्ती चौक, जयभवानी चौक, मोहटादेवी मंदिर आदी चौकात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. मोहटादेवी चौकात एका ट्रॅक्टरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर जयभवानी चौकात कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविल्याची घटना घडली आहे. सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी बजाजनगरात गतीरोधक उभारणे गरजचे आहे.

या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले की, गतीरोधक उभारण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. याविषयी लवकरच स्थळ पाहणी करुन स्थानिक पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Walujवाळूज