शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

जिल्ह्यांत प्रशासन सक्षम

By admin | Updated: June 29, 2016 01:00 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागीय आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आठ जिल्ह्यांत लातूर, उस्मानाबाद आणि काही प्रमाणात नांदेड जिल्हा प्रशासन

औरंगाबाद : मराठवाडा विभागीय आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आठ जिल्ह्यांत लातूर, उस्मानाबाद आणि काही प्रमाणात नांदेड जिल्हा प्रशासन सक्षमपणे नागरिकांसाठी यंदा दिलासादायी काम करीत असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विभागात मागील चार वर्षांपासून सतत दुष्काळ पडतो आहे. दुष्काळात बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांनी सर्वाधिक झळा सोसल्या. जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील दुष्काळामुळे जलयुक्त शिवार योजनेसह इतर टंचाईच्या कामांचा राबता होता. परंतु या जिल्ह्यांत काही ठिकाणी जलयुक्त शिवाराची कामे पावसाळा सुरू झाला तरीही पूर्ण झालेली नाहीत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये औरंगाबाद शहर मागे आहे, तर बीड जिल्हा प्रशासनाने चारा छावण्या बंद करण्याप्रकरणी मध्यंतरी शासनाला अहवाल दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांचा आकडा ३७६ पर्यंत गेला होता, तर सर्वाधिक टँकर बीडमध्ये सुरू होते. दुष्काळात सर्वाधिक पाणीटंचाई लातूर शहरात निर्माण झाली होती. रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षीच्या दुष्काळात झाला होता. लातूर शहरात जिल्हा प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली. जलयुक्त शिवार योजनेत लातूरमध्ये चांगले काम झाल्यामुळे जून महिन्यातील पावसातच त्याचा लाभ पाहावयास मिळाला आहेत. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेतील १६८२ पैकी अंदाजे ३५० गावांत कामे पूर्ण झाल्याचे दिसते. १३३२ गावांत आता कामे आता होतील अशी शक्यता नाही. ४गेल्या वर्षी जलयुक्त शिवारसाठी १६८२ गावे निवडण्यात आली होती. पावसाळा सुरू झाल्याने जास्तीची कामे होतील अशी शक्यता नाही.