शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

प्रशासनाने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले- लोणीकर

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जालना : प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी पत्राव्दारे केला आहे.

जालना : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून सरकार तसेच प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांना पाठविलेल्या पत्राव्दारे केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर विविध खात्यांचे मंत्री बदनापुरात दाखल झाले. त्यांनी परिस्थिती पाहणी केली. त्यावेळी पंधरा दिवसाच्या आत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या घटनेला दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालीच नाही.परतूर तालुक्यातील पिंपरखेडा, श्रीधरजवळा यासह २७ गावांतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान होऊनही वगळण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील वरूड येवता, भाटी पासोडी यासह काही गावेच यादीतून वगळले. अंबड तालुक्यातील बहुभूधारक शेतकऱ्यांना यादीतून वगळले. घनसावंगी तालुक्यातील ७४ हजार १६७ शेतकरी बाधित असताना फक्त १२ हजार ८८२ शेतकऱ्यांनाच मदत जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातील ५२ गावातील शेतकऱ्यांनी तहसीलसमोर उपोषण करून मदतीची मागणीही केली होती.जालना तालुक्यातील नेर, सेवली सर्कलसह ४५ गावांचे नुकसान झाले आहे. मात्र फक्त २२ गावांचा यादीत समावेश केला आहे. भोकरदन तालुक्यातील काही गावांच्या याद्या बँकेकडे देण्यात आल्या परंतु बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली नसल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. जालना तालुक्यातील दहिफळ, उमरी, धारा, उखळी, गुंडेवाडी या गावांतील काही शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची टीका केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, मदनलाल सिंधी, दीपक ठाकूर, संजय तौर, बाबूराव खरात, मोहन बाहेकर, उमाकांत मानवतकर, राम माने, गणेश खवने, कृष्णा जिगे, सुधाकर खरात, ज्ञानेश्वर शेजूळ, सुभाष पालवे, शहाजी राक्षे गणपतराव सातपुते उपस्थित होते. (प्रतिनिधी)