शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

प्रशासनाने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले- लोणीकर

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जालना : प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी पत्राव्दारे केला आहे.

जालना : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून सरकार तसेच प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांना पाठविलेल्या पत्राव्दारे केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर विविध खात्यांचे मंत्री बदनापुरात दाखल झाले. त्यांनी परिस्थिती पाहणी केली. त्यावेळी पंधरा दिवसाच्या आत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या घटनेला दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालीच नाही.परतूर तालुक्यातील पिंपरखेडा, श्रीधरजवळा यासह २७ गावांतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान होऊनही वगळण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील वरूड येवता, भाटी पासोडी यासह काही गावेच यादीतून वगळले. अंबड तालुक्यातील बहुभूधारक शेतकऱ्यांना यादीतून वगळले. घनसावंगी तालुक्यातील ७४ हजार १६७ शेतकरी बाधित असताना फक्त १२ हजार ८८२ शेतकऱ्यांनाच मदत जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातील ५२ गावातील शेतकऱ्यांनी तहसीलसमोर उपोषण करून मदतीची मागणीही केली होती.जालना तालुक्यातील नेर, सेवली सर्कलसह ४५ गावांचे नुकसान झाले आहे. मात्र फक्त २२ गावांचा यादीत समावेश केला आहे. भोकरदन तालुक्यातील काही गावांच्या याद्या बँकेकडे देण्यात आल्या परंतु बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली नसल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. जालना तालुक्यातील दहिफळ, उमरी, धारा, उखळी, गुंडेवाडी या गावांतील काही शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची टीका केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, मदनलाल सिंधी, दीपक ठाकूर, संजय तौर, बाबूराव खरात, मोहन बाहेकर, उमाकांत मानवतकर, राम माने, गणेश खवने, कृष्णा जिगे, सुधाकर खरात, ज्ञानेश्वर शेजूळ, सुभाष पालवे, शहाजी राक्षे गणपतराव सातपुते उपस्थित होते. (प्रतिनिधी)