शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

६ कोटींच्या वसुलीबाबत प्रशासन गप्पच !

By admin | Updated: August 6, 2015 00:07 IST

लातूर : बोगस तुकड्या प्रकरणी न्यायालयाने व चौकशी समितीने दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडून ६ कोटी ५८ लाख ९७ हजार रुपयांच्या

लातूर : बोगस तुकड्या प्रकरणी न्यायालयाने व चौकशी समितीने दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. त्यांच्याकडून ६ कोटी ५८ लाख ९७ हजार रुपयांच्या वसुलीचेही निर्देश दिले आहेत. मात्र या वसुलीबाबत जिल्हा परिषद प्रशासन गप्पच आहे. दुसरीकडे मात्र किरकोळ प्रकरणात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कशी कारवाई केली जाते, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागतील तत्कालीन शिक्षणाधिकारी विलास जोशी यांच्या कार्यकाळात उर्दू खाजगी शाळेतील शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन अनियमितरित्या केल्याबद्दल चौकशी व निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदविली होती़ तसेच न्यायालयाकडेही धाव घेतली़ या प्रकरणाची शिक्षण सहसंचालकांनी माहिती घेवून संबंधित तत्कालीन शिक्षणाधिकारी विलास जोशी यांना निलंबित केले होते़ सहा महिन्यानंतर पुन्हा त्यांना सेवेत घेण्यात आले. पण ते सेवानिवृत्त झाले आहेत़ या शिवाय दुसरी कारवाई करण्यात आली नाही़ न्यायालयाने वेळोवेळी याबाबत ताशेरे ओढले आहेत. त्यानंतरही शिक्षण विभागाने दोषी असलेल्या संबंधित ९ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर ६ कोटी ५८ लाख ९७ हजार ९५० रुपयांची वसुली निश्चित केली. तब्बल नऊ महिने होऊनही वसुली करण्यात आली नाही. वसुलीचे पत्र प्रशासनाच्या फायलीत दडलेलेच आहे. वसुली का होत नाही. गुन्हे दाखल करण्याची कारवाई का होत नाही, असे प्रश्न जि.प. सदस्यांनी उपस्थित केले आहेत. किरकोळ प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई केली आहे. मात्र या प्रकरणातील वसुलीला सुरुवातही केली नाही. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जि.प. प्रशासनन पाठीशी घालत आहे का? असा आरोपही सदस्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)चाकूर तालुक्यात पत्रे खरेदी अपहार प्रकरणात ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले़ एका कर्मचाऱ्याकडून जि़प़ सदस्यांना पत्र व सभेचा अहवाल देण्यात कसूर झाला तर त्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले़ पण शिक्षण विभागातील ६ कोटी ५८ कोटी ९७ हजार ९५० रुपयांच्या वसुलीची निश्चिती झाली असताना वसुली का नाही, असा सवाल प्रशासनाकडे जिल्हा परिषदेचे सदस्य रामचंद्र तिरूके, चंद्रकांत मद्दे, सहदेव मस्के यांनी केला आहे.