शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

प्रशासनच बनले शुक्राचार्य

By admin | Updated: October 5, 2016 01:14 IST

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची प्रलंबित देयके एक महिन्यात निकाली काढावीत

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची प्रलंबित देयके एक महिन्यात निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश देऊनही अद्यापपर्यंत तसे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत दाखलच झालेले नाहीत अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे.सन २०१६ च्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत जवखेडा बु. (ता.कन्नड) येथे २६२ मजुरांच्या पाझर तलावाच्या कामाची मजुरी देण्याबाबत प्रश्न क्र. २२१६१ उपस्थित झाला होता. या प्रश्नावर रोहयो मंत्री यांच्याकडे दि. १७ जुलै रोजी बैठकीत चर्चा झाली. जवखेडा बु.सह संपूर्ण जिल्ह्यातील सन २०१२-१३ व त्यापुर्वीच्या प्रलंबित मजुरी देयकाबाबतचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांनी १० दिवसात निकाली काढून आयुक्त (नरेगा) नागपूर यांच्याकडे सादर करावे, प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसाच्या आत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रलंबित मजुरी देयकांचे प्रदान करावे, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी संयुक्त स्वाक्षरीने विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, विभागीय आयुक्त यांनी १ महिन्यात प्रस्ताव निकाली काढावे, अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या. या सुचना देणारे पत्र २७ जुलै २०१६ रोजी काढण्यात आले होते. पंचायत समितीला हे पत्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाले. मात्र पावणेदोन महिने उलटले तरीही पंचायत समितीने प्रलंबित देयकाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केलेले नाहीत.