शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सजग

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे. येत्या १५ ते २0 आॅगस्टपर्यंत पाणी व चाराटंचाईबाबतचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी. जी. कासार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी बी. एम. निलावाड, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार, चंद्रशेखर सरोदे, एम. आर. कोपलवार आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात १५ ते २0 टक्के पर्जन्यमान असल्याने पिकांची स्थिती गंभीर आहे. त्यातच भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी व चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाचे आदेश दिले आहेत. सध्या कोठेही टंचाईची स्थिती नसली तरी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम झाले. ते पूर्ण झाले असेल तर ती योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित झाली पाहिजे, अशी भूमिका जिल्हाधिकारी कासार यांनी मांडली. तर तयार असलेल्या सर्व ७६ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे ठरले. पाणीसाठा राखीव करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जि.प.ने पेयजल सुरक्षित अधिनियमानुसार संयुक्त जाहीरनामा काढण्याचे ठरले. त्यात जलसाठ्यांतून पिण्यासाठी सोडला तर इतर कोणत्याही कारणासाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश देण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडून पाणीउपसा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही सुचित केले. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ७५00 हेक्टरवर चारा पीक घेण्यात येणार आहे. त्यात मका, न्यूट्रीफिड गवत, बाजरी प्रत्येक तालुक्यात १५00 हेक्टरवर घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे बियाणे वाटप होईल. पशुसंवर्धनतर्फेही बियाणे वाटप करून चारा पीक घेण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जि.प.नेही शेष निधीतून असा उपक्रम राबविण्याची सूचना दिली. जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार ८७३ जनावरे असून त्यासाठी प्रतिदिन २ हजार मे. टन चारा आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. लघुसिंचन विभागातर्फे पाचही तालुक्यांत प्रत्येकी दोन गावांत जलसंधारणाची कामे सुरू असून २.७८ कोटींचा निधी मंजूर आहे, असे लघुपाटबंधारेचे कोपलवार यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)