शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रशासन सजग

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सजग झाले आहे. येत्या १५ ते २0 आॅगस्टपर्यंत पाणी व चाराटंचाईबाबतचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी. जी. कासार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी बी. एम. निलावाड, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार, चंद्रशेखर सरोदे, एम. आर. कोपलवार आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात १५ ते २0 टक्के पर्जन्यमान असल्याने पिकांची स्थिती गंभीर आहे. त्यातच भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी व चाराटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाचे आदेश दिले आहेत. सध्या कोठेही टंचाईची स्थिती नसली तरी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम झाले. ते पूर्ण झाले असेल तर ती योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित झाली पाहिजे, अशी भूमिका जिल्हाधिकारी कासार यांनी मांडली. तर तयार असलेल्या सर्व ७६ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे ठरले. पाणीसाठा राखीव करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जि.प.ने पेयजल सुरक्षित अधिनियमानुसार संयुक्त जाहीरनामा काढण्याचे ठरले. त्यात जलसाठ्यांतून पिण्यासाठी सोडला तर इतर कोणत्याही कारणासाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश देण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडून पाणीउपसा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही सुचित केले. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ७५00 हेक्टरवर चारा पीक घेण्यात येणार आहे. त्यात मका, न्यूट्रीफिड गवत, बाजरी प्रत्येक तालुक्यात १५00 हेक्टरवर घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे बियाणे वाटप होईल. पशुसंवर्धनतर्फेही बियाणे वाटप करून चारा पीक घेण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जि.प.नेही शेष निधीतून असा उपक्रम राबविण्याची सूचना दिली. जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार ८७३ जनावरे असून त्यासाठी प्रतिदिन २ हजार मे. टन चारा आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. लघुसिंचन विभागातर्फे पाचही तालुक्यांत प्रत्येकी दोन गावांत जलसंधारणाची कामे सुरू असून २.७८ कोटींचा निधी मंजूर आहे, असे लघुपाटबंधारेचे कोपलवार यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)