शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

माध्यमिक शिक्षकांची समायोजन प्रक्रिया दुसऱ्यांदा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या ५५ प्रशालांमध्ये सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या ७४ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन वादाच्या भोवऱ्यात अडकले ...

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या ५५ प्रशालांमध्ये सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या ७४ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. समायोजन प्रक्रियेवर शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी आक्षेप घेतल्यामुळे मंगळवारी नियोजित समायोजन प्रक्रिया थांबविण्यात आली. आतापर्यंत सलग दोन वेळा ही प्रक्रिया स्थगित झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांची (प्रशाला) संचमान्यता सन २०१८-१९ मध्ये झाली. त्यानंतर सन २०२० मध्ये लॉकडाऊन लागले व तेव्हापासून शाळा उघडल्याच नाहीत. यंदाही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे सलग दोन वर्षांपासून संचमान्यता रखडली आहे. तथापि, सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार प्रशालांतील ७४ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले असून, त्यांचे रिक्त जागांवर समायोजन केले जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांच्या आदेशानुसार मंगळवारी समायोजन प्रक्रियेचे ऑनलाइन नियोजन शिक्षण विभागाने केले होते. तशा सूचना सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

दरम्यान, सोमवारी शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. ही प्रक्रिया आता राबवत आहात, तर नियमानुसार ती सन २०२०-२१ च्या संचमान्यतेनुसारच राबविली पाहिजे. समायोजन करताना अगोदर शिक्षकांना जिल्हाभरातील रिक्त जागा दाखविण्यात यावी, असे सभापती गलांडे यांचे म्हणणे आहे, तर शिक्षण विभाग तालुकानिहाय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन राबविणार होते. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी हेच आता समायोजन प्रक्रियेची पुढील तारीख निश्चित करतील. आज शाळांच्या सुनावणीमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले.