शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरच

By admin | Updated: June 28, 2016 00:50 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आणि तेथे अध्यापनासाठी शिक्षक जास्त असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी

औरंगाबाद : जिल्ह्यात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आणि तेथे अध्यापनासाठी शिक्षक जास्त असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आज सोमवारी शिक्षण समितीच्या बैठकीत सादर केला. त्यानुसार जि.प.च्या अशा १५४ शाळांतील शिक्षकांचे समायोजन जिथे विद्यार्थी संख्या अधिक आहे; पण तिथे शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या शाळांवर करण्याचा निर्णय सभापती विनोद तांबे यांनी घेतला. यासंबंधीचा प्रस्ताव लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. शाळांच्या गरजेनुसार प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षकांना तेथे पाठविले जाईल. नुकतेच जिल्ह्यात विनाअनुदानित तत्त्वावर ३०९ नवीन शाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शाळांना महिनाभराच्या आत जि. प. शिक्षण समितीकडून ३:१ ची मान्यता घेणे बंधनकारक असते. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या या शाळांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या असून, आठ दिवसांत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे त्यांना सांगितले आहे. शासनाची मान्यता मिळालेल्या या शाळांना ३:१ ची मान्यता देण्यापूर्वी संबंधितांनी शाळा सुरू करण्याबाबतच्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल. अलीकडे अनेक ठिकाणच्या जि. प. शाळांमध्ये ८ वी व ९ वीचे वर्ग सुरू करण्याची पालकांची मागणी आहे. त्यानुसार शासन निर्णयाच्या अधीन राहून असे वर्ग सुरू करण्यास जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश दिले जाणार असल्याचे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.या बैठकीस बबन कुंडारे, प्रभाकर काळे, संतोष माने, मधुकर वालतुरे, श्याम राजपूत, आबा जगताप, पुष्पा जाधव, संगीता सुंब, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, उपशिक्षणाधिकारी रमेश तांगडे, सरताज खान पठाण आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून अवघ्या ३३ शाळांची दुरुस्ती होऊ शकते. मात्र, सद्य:स्थितीत जवळपास ६० ते ७० शाळा इमारती ४५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. जवळपास २५० ते ३०० शाळांच्या इमारती दुरुस्तीला आलेल्या आहेत. यासाठी पालकमंत्री रामदास कदम आणि जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्याकडे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपयांचा जास्तीच्या निधीची मागणी केली जाणार आहे, असे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सांगितले.