शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुरेशी नोकरभरती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ...

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ताण कमी न होता बँकिंग सेवेचा विस्फोट होत आहे. विविध कर्मचारी संख्या मात्र, घटली आहे. यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. परिणामी ग्राहकांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन नोकरभरती करण्यात यावी, तेही पुरेशी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशन (एआयबीइए) महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (दि.१६) शहरात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलाविली आहे. याचे स्वागत एआयबीइएच्या वतीने करण्यात आले. यासंदर्भात तुळजापूरकर यांनी सांगितले की, यानिमित्ताने सामाजिक बँकिंगची जी भूमिका सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांना दिलेली आहे ती अधोरेखित होणार आहे. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एक अस्वस्थतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खासगीकरणाची टांगती तलवार तशीच कायम ठेवून या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सामाजिक बँकिंग उदिष्टे कशा पूर्ण करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बँकांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले, अनेकजण निवृत्त झाले, अनेकांनी राजीनामा दिला पण त्यांची रिकामी झालेल्या जागेवर नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नाही. अनेक शाखा एक किंवा दोन कर्मचारीच काम करत आहेत. सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी व बँकिंगची सेवा आणखी उत्कृष्ट होण्यासाठी पुरेशी कर्मचारी भरती करणे आवश्यक असून त्यादृष्टीने बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली.

चौकट

देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, डिजिटल बँकिंग आणि डिजिटल इंडियाचे स्वप्नपूर्ण करायचे आहे. त्यासाठी सर्वदूर निरंतर वीजपुरवठा करण्यात यावा, टेलिफोनची निरंतर सेवा असावी, यात भारत सरकार आणि बँका यांनी समन्वयाने आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञानाची पुरेशी ओळख ग्राहकांमध्ये करण्यासाठी अभियान राबवावे. नसता डिजिटल बँकिंगच्या नावावर घोटाळेबाज ग्राहकांची लूट करतील, या विषयावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.