शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुरेशी नोकरभरती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ...

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ताण कमी न होता बँकिंग सेवेचा विस्फोट होत आहे. विविध कर्मचारी संख्या मात्र, घटली आहे. यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. परिणामी ग्राहकांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन नोकरभरती करण्यात यावी, तेही पुरेशी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशन (एआयबीइए) महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (दि.१६) शहरात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलाविली आहे. याचे स्वागत एआयबीइएच्या वतीने करण्यात आले. यासंदर्भात तुळजापूरकर यांनी सांगितले की, यानिमित्ताने सामाजिक बँकिंगची जी भूमिका सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांना दिलेली आहे ती अधोरेखित होणार आहे. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एक अस्वस्थतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खासगीकरणाची टांगती तलवार तशीच कायम ठेवून या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सामाजिक बँकिंग उदिष्टे कशा पूर्ण करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बँकांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले, अनेकजण निवृत्त झाले, अनेकांनी राजीनामा दिला पण त्यांची रिकामी झालेल्या जागेवर नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नाही. अनेक शाखा एक किंवा दोन कर्मचारीच काम करत आहेत. सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी व बँकिंगची सेवा आणखी उत्कृष्ट होण्यासाठी पुरेशी कर्मचारी भरती करणे आवश्यक असून त्यादृष्टीने बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली.

चौकट

देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, डिजिटल बँकिंग आणि डिजिटल इंडियाचे स्वप्नपूर्ण करायचे आहे. त्यासाठी सर्वदूर निरंतर वीजपुरवठा करण्यात यावा, टेलिफोनची निरंतर सेवा असावी, यात भारत सरकार आणि बँका यांनी समन्वयाने आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञानाची पुरेशी ओळख ग्राहकांमध्ये करण्यासाठी अभियान राबवावे. नसता डिजिटल बँकिंगच्या नावावर घोटाळेबाज ग्राहकांची लूट करतील, या विषयावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.