शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुरेशी नोकरभरती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ...

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ताण कमी न होता बँकिंग सेवेचा विस्फोट होत आहे. विविध कर्मचारी संख्या मात्र, घटली आहे. यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. परिणामी ग्राहकांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन नोकरभरती करण्यात यावी, तेही पुरेशी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशन (एआयबीइए) महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (दि.१६) शहरात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलाविली आहे. याचे स्वागत एआयबीइएच्या वतीने करण्यात आले. यासंदर्भात तुळजापूरकर यांनी सांगितले की, यानिमित्ताने सामाजिक बँकिंगची जी भूमिका सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांना दिलेली आहे ती अधोरेखित होणार आहे. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एक अस्वस्थतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खासगीकरणाची टांगती तलवार तशीच कायम ठेवून या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सामाजिक बँकिंग उदिष्टे कशा पूर्ण करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बँकांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले, अनेकजण निवृत्त झाले, अनेकांनी राजीनामा दिला पण त्यांची रिकामी झालेल्या जागेवर नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नाही. अनेक शाखा एक किंवा दोन कर्मचारीच काम करत आहेत. सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी व बँकिंगची सेवा आणखी उत्कृष्ट होण्यासाठी पुरेशी कर्मचारी भरती करणे आवश्यक असून त्यादृष्टीने बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली.

चौकट

देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, डिजिटल बँकिंग आणि डिजिटल इंडियाचे स्वप्नपूर्ण करायचे आहे. त्यासाठी सर्वदूर निरंतर वीजपुरवठा करण्यात यावा, टेलिफोनची निरंतर सेवा असावी, यात भारत सरकार आणि बँका यांनी समन्वयाने आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञानाची पुरेशी ओळख ग्राहकांमध्ये करण्यासाठी अभियान राबवावे. नसता डिजिटल बँकिंगच्या नावावर घोटाळेबाज ग्राहकांची लूट करतील, या विषयावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.