शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुरेशी नोकरभरती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ...

औरंगाबाद : अद्ययावत तंत्रज्ञानाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना पुरविण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, संगणकीकरण होऊनही कामाचा ताण कमी न होता बँकिंग सेवेचा विस्फोट होत आहे. विविध कर्मचारी संख्या मात्र, घटली आहे. यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. परिणामी ग्राहकांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन नोकरभरती करण्यात यावी, तेही पुरेशी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशन (एआयबीइए) महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (दि.१६) शहरात सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलाविली आहे. याचे स्वागत एआयबीइएच्या वतीने करण्यात आले. यासंदर्भात तुळजापूरकर यांनी सांगितले की, यानिमित्ताने सामाजिक बँकिंगची जी भूमिका सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांना दिलेली आहे ती अधोरेखित होणार आहे. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एक अस्वस्थतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खासगीकरणाची टांगती तलवार तशीच कायम ठेवून या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सामाजिक बँकिंग उदिष्टे कशा पूर्ण करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बँकांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले, अनेकजण निवृत्त झाले, अनेकांनी राजीनामा दिला पण त्यांची रिकामी झालेल्या जागेवर नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नाही. अनेक शाखा एक किंवा दोन कर्मचारीच काम करत आहेत. सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी व बँकिंगची सेवा आणखी उत्कृष्ट होण्यासाठी पुरेशी कर्मचारी भरती करणे आवश्यक असून त्यादृष्टीने बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली.

चौकट

देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, डिजिटल बँकिंग आणि डिजिटल इंडियाचे स्वप्नपूर्ण करायचे आहे. त्यासाठी सर्वदूर निरंतर वीजपुरवठा करण्यात यावा, टेलिफोनची निरंतर सेवा असावी, यात भारत सरकार आणि बँका यांनी समन्वयाने आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञानाची पुरेशी ओळख ग्राहकांमध्ये करण्यासाठी अभियान राबवावे. नसता डिजिटल बँकिंगच्या नावावर घोटाळेबाज ग्राहकांची लूट करतील, या विषयावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.