शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उद्योगनगरीतील ग्रामपंचायतींच्या तिजोरीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:04 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उतरणाऱ्या भावी सदस्यांकडून थकीत कराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात झुंबड उडत ...

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उतरणाऱ्या भावी सदस्यांकडून थकीत कराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात झुंबड उडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत चांगलीच भर पडत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी केली आहे. या बड्या ग्रामपंचायतींत वर्णी लागावी, यासाठी गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन भावी उमेदवारांकडून दिले जात आहे. या भागातील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, पंढरपूर, नारायणपूर, वळदगाव, पाटोदा, अंबेलोहळ आदी अर्थिकदृष्टया संपन्न ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जुळवा-जुळव सुरू केली आहे. सद्यस्थितीत गावात पॅनल तयार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथान बैठका सुरू आहेत. प्रत्येक वॉर्डातील जातीनिहाय, सक्षम तसेच वाॅर्डात चांगला जनसंपर्क असलेल्या उमेदवारांचा प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शोध घेण्यात येत आहे. या बड्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येकी चार-पाच पॅनल राहणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर अपक्ष म्हणून अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी केली आहे. आपल्या वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, यासाठी सक्षम उमेदवारांकडून त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र वाळूजमहानगर परिसरात आहे.

थकीत करामुळे तिजोरीत भर पडणार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांकडून ग्रामपंचायतीचा थकीत कराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी करीत आहेत. थकबाकी असलेल्यांना निवडणूक लढविता येत नसल्यामुळे अनेकांनी उधारी-उसनवारी करून तसेच स्वत:जवळ जमा असलेल्या पैशातून थकीत कराचा भरणा करीत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थकीत कर भरण्यासाठी झुंबड उडाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत चांगलीच भर पडणार असल्याचे रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले, जोगेश्वरीचे बी. एल. भालेराव, वाळूजचे एस. सी. लव्हाळे, वळदगावचे श्रीकांत पालवे, पंढरपूरचे नारायण रावते आदींनी लोकमतला सांगितले. बुधवारपासून नामांकन अर्ज स्वीकारले जाणार असल्यामुळे थकीत कर भरणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

---------------------------