शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते हिरमुसले

By admin | Updated: February 28, 2017 00:54 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे चळवळीतील विविध पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या जोमाने रिंगणात उतरले होते

उस्मानाबाद : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे चळवळीतील विविध पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या जोमाने रिंगणात उतरले होते. मात्र, एक-दोन अपवाद वगळता मनसेसह शेकाप, भारिप, संभाजी ब्रिगेड, एमआयएम, रासप, रिपाइं आदी पक्षांच्या उमेदवारांकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. काही उमेदवारांना तर मतदानाची शंभरीही गाठता न आल्याने या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत अस्वस्थतेचे वातावरण आहे. यंदा प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने तीन जिल्हा परिषद गटांसह नऊ पंचायत समिती गणात उमेदवार उतरविले होते. त्याचप्रमाणे भारिप बहुजन महासंघानेही जिल्हा परिषदेच्या चार गटांसह सहा गणांत उमेदवार दिले होते. तर एमआयएमने तीन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती गणातून आपली ताकद आजमावली. याबरोबरच शेकाप, मनसे, रिपाइं, रासप यांचेही उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, बहुतांश उमेदवारांना निराशेचा सामना करावा लागला. प्रमुख चार पक्ष वगळता मतदारांनी या पक्षांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. तुळजापूर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. सिंदफळ गटातून स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे रिंगणात होते. त्यांना अवघी १८३ मते पडली आहेत. याच गटातून शेतकरी कामगार पक्षातर्फे नेताजी गोरे यांनी निवडणूक लढविली. गोरे यांना २०० मतांवर समाधान मानावे लागले, तर अपक्ष तात्या रोडे यांनी १११ मते मिळविली. काक्रंबा गटातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नागरबाई कोळेकर यांना ३१७, तर नंदगाव गटातून रासपच्याच सोमनाथ गुड्डे यांना ८५५ मते मिळाली. येथे अपक्ष अंगद सलगर यांना अवघी ९१ मते मिळाली. सिंदफळ गणातून अपक्ष म्हणून छाया कांबळे आणि समाधान धाकतोडे यांनी निवडणूक लढविली. त्यांना अनुक्रमे १६९ व १२२ मते मिळाली. अपसिंग्यातून मनसेच्या महेश जाधव यांना ६५९, तर भारिपच्या दिलीप फडके यांना ४३८ मतांवर समाधान मानावे लागले. काक्रंब्यातून जनहित विकास पार्टीच्या संतोष दूधभाते यांना २४१, मंगरुळमधून अपक्ष सतीश जवळगेकर २६० मते मिळाली. तामलवाडीमधून संभाजी ब्रिगेडच्या वतीने अक्षय नलवडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना १६९ मते, तर मनसेच्या अमोल मोटे यांना ५३ मते मिळाली. नंदगाव गणातून रासपच्या वतीने निवडणूक लढविलेल्या सोमनाथ बनसोडे यांना १०६, तर येवती येथील अपक्ष उमेदवार वंदना कांबळे यांना २२८३ आणि खुदावाडीतील अपक्ष उमेदवार उषा राठोड यांना ९३१ मतांवर समाधान मानावे लागले. परंडा तालुक्यातही रासप तसेच मनसेने स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. यात रासपच्या वतीने लोणी, जवळा, अनाळा या जिल्हा परिषद गटात असलेल्या तीन उमेदवारांनी मिळून ११९२ मते मिळविली, तर मनसेने शेळगाव, अनाळा, डोंजा या गटात निवडणूक लढविली. तेथे तीन उमेदवारांना मिळून अवघी ६३३ मते हाती लागली. उमरगा तालुक्यात भारिप बहुजन महासंघाने बलसूर गटातून नेताजी गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ३९८, तर माडज गणातील उमेदवार राजेंद्र बिराजदार यांना २४१ मते मिळाली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवडणूक लढविलेल्या माडज गणातील चंद्रकांत काळे यांना केवळ १५६ मतांवर समाधान मानावे लागले. अशीच परिस्थिती उमरगा तालुक्यातही राहिली. तालुक्यातील कानेगाव जि.प. गटातून रिपाइंच्या मीनाबाई अर्जुन मुके रिंगणात होत्या. त्यांना ८९४ मते मिळाली, तर माकणी गटातून निवडणूक लढविलेल्या संभाजी ब्रिगेडच्या मधुमती दीपक गोरे यांना अवघी २४८ मते मिळाली. जिल्हा परिषद गटाप्रमाणेच पंचायत समितीसाठी असलेल्या उमेदवारांना अत्यल्प समाधान मानावे लागले. धानुरी गणातून निवडणूक लढविलेल्या सुनीता शिवानंद राठोड यांना १४१, तर सास्तूर गणातील संभाजी ब्रिगेडच्या सुनील दगडू साळुंके यांना अवघी १४८ मते मिळाली. अचलेर गणातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार रवींद्र नवनाथ सोनवणे यांच्या पारड्यात केवळ ७० मते पडली. वाशी तालुक्यात मनसेने तेरखेडा गटातून उमेदवार दिला होता. या उमेदवारालाही केवळ २१० मतांवर समाधान मानावे लागले.कळंब तालुक्यात भारतीय परिवर्तन सेनेच्या उमेदवार विजयी झाल्या असल्या तरी प्रमुख पक्ष वगळता इतर पक्षांकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. मंगरुळ गटातून रासपतर्फे निवडणूक लढविलेल्या अलका लोकरे यांना ४३४, शिराढोण गटातून निवडणूक लढविलेल्या एमआयएमच्या कलीम बागवान यांना ३२७, मोहा गटातून शेकापच्या राजाभाऊ पाटील यांना ३३३, येरमाळा गटातून संभाजी ब्रिगेडच्या वसंत बारकुल यांना १७०, मंगरुळमधून माकपच्या शोभा गायकवाड यांना २२२, तर मंगरुळमधूनच संभाजी ब्रिगेडच्या सत्वशीला वाघमारे यांना २३७ मते मिळाली. डिकसळ गणातून रिपाइं (आठवले) गटाच्या संगीता भालेराव यांना १२४, तर शिराढोण गणातील एमआयएमच्या राम गायकवाड यांना १७६ मते मिळाली. अशीच स्थिती जवळा गणात दिसून आली. तेथे मनसेच्या दत्तात्रय घोगरे यांना ८७, रांजणी गणातील बसपाच्या श्रीमंत गायकवाड यांना १०८, तर डिकसळ गणातील संभाजी ब्रिगेडच्या सोनिया कुरुंद यांना अवघी ६६ मते मिळाली. उस्मानाबाद तालुक्यातही प्रमुख पक्ष वगळता इतर उमेदवारांच्या पदरी निराशा पडली. मात्र बेंबळी गणातून एमआयएमच्या सिद्दीक बावडीवाले यांनी १५५८ इतकी लक्षवेधी मते घेतली. अशीच लढत वडगाव जिल्हा परिषद गटातून अपक्ष दिनेश बंडगर यांनी दिली. त्यांना १५४१ मतांवर समाधान मानावे लागले.