शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कार्यकर्ते होताहेत निवडणूक रिंगणातून हद्दपार..!

By admin | Updated: January 29, 2017 23:46 IST

उस्मानाबाद कार्यकर्ते हद्दपार होत असल्याची विदारक स्थिती पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकर्षाने दिसत आहे.

विशाल सोनटक्के  उस्मानाबादभाई उद्धवराव पाटील यांच्या वेळचा काळ हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा होता. ताकद, पैसा, यंत्रणा या ऐवजी निष्ठेच्या बळावर निवडणुकीची तिकीटे दिली जात होती. राजकारणातील हा निष्ठेचा धडा उस्मानाबाद जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्राला दिला. त्याच जिल्ह्यातील राजकारणात आज लक्ष्मी दर्शनाला महत्व आले आहे. पर्यायाने कार्यकर्ते हद्दपार होत असल्याची विदारक स्थिती पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकर्षाने दिसत आहे.आजच्या निवडणुकीचे वातावरण पाहिले असता, उध्दवरावांच्या काळात उस्मानाबादकरांनी पाहिलेल्या राजकारणाचा सारिपाट डोळ्यासमोर उभा राहतो. तो काळ शेकाप, जनता दल, जनता पक्ष यांचा होता. आणि या पक्षांपेक्षाही खऱ्या अर्थाने पक्षातील कार्यकर्त्यांचा, त्यावेळी पैसा हे माध्यम नव्हते तर प्रतिष्ठा आणि पक्षाच्या विचाराप्रती असलेल्या निष्ठेला महत्व होते. कार्यकर्त्याला संधी देणारा हा काळ आता इतिहास होवू पहात आहे.१९६० साली उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून भाई उद्धवराव पाटील यांनी निवडणूक लढवावी म्हणून कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह होता. या आग्रहाला मान देत उद्धवराव पाटील निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी उस्मानाबाद परिसरातील २५ ते ३० गावातील नागरिकांनी निवडणूक निधी गोळा केला. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी लोकवर्गणी जमा करणाऱ्यांमध्ये शेतमजुरांची संख्या सर्वाधिक होती. या लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातूनच उद्धवराव पाटील यांच्या उमेदवारी अर्जासह डिपॉझीटही भरण्यात आले. आपल्याच मातीतील ही घटना आज सांंगूनही खरी वाटणार नाही. अशी परिस्थितीच राजकारणात निर्माण झाली आहे. त्यावेळी केवळ विकास आणि विरोधकांचा भ्रष्टाचार हे दोनच प्रचाराचे मुद्दे असायचे, सभाही मोजक्याच व्हायच्या. भाषणामध्ये टिका असायची परंतु ठोस पुराव्यासह. आज निवडणुकीचा प्रचार आणि प्रचाराची साधने बदलली असून, राजकारणाचे तंत्रही बदलले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्ता ही संकल्पनाच बाद होत असल्याचे चित्र आहे. किंबहुना सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविणेच अशक्य होवून बसले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षात सुरु आहे. या प्रक्रियेत आता सर्वाधिक महत्व आहे ते निवडून येण्याच्या क्षमतेला. त्यापाठोपाठ दुसरा प्रश्न असतो तो निवडणुकीत खर्च किती करणार? या दोन्ही प्रश्नावरच वर्षानुवर्ष एकनिष्ठपणे पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची विकेट पडत आहे.