शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्ते होताहेत निवडणूक रिंगणातून हद्दपार..!

By admin | Updated: January 29, 2017 23:46 IST

उस्मानाबाद कार्यकर्ते हद्दपार होत असल्याची विदारक स्थिती पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकर्षाने दिसत आहे.

विशाल सोनटक्के  उस्मानाबादभाई उद्धवराव पाटील यांच्या वेळचा काळ हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा होता. ताकद, पैसा, यंत्रणा या ऐवजी निष्ठेच्या बळावर निवडणुकीची तिकीटे दिली जात होती. राजकारणातील हा निष्ठेचा धडा उस्मानाबाद जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्राला दिला. त्याच जिल्ह्यातील राजकारणात आज लक्ष्मी दर्शनाला महत्व आले आहे. पर्यायाने कार्यकर्ते हद्दपार होत असल्याची विदारक स्थिती पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकर्षाने दिसत आहे.आजच्या निवडणुकीचे वातावरण पाहिले असता, उध्दवरावांच्या काळात उस्मानाबादकरांनी पाहिलेल्या राजकारणाचा सारिपाट डोळ्यासमोर उभा राहतो. तो काळ शेकाप, जनता दल, जनता पक्ष यांचा होता. आणि या पक्षांपेक्षाही खऱ्या अर्थाने पक्षातील कार्यकर्त्यांचा, त्यावेळी पैसा हे माध्यम नव्हते तर प्रतिष्ठा आणि पक्षाच्या विचाराप्रती असलेल्या निष्ठेला महत्व होते. कार्यकर्त्याला संधी देणारा हा काळ आता इतिहास होवू पहात आहे.१९६० साली उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून भाई उद्धवराव पाटील यांनी निवडणूक लढवावी म्हणून कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह होता. या आग्रहाला मान देत उद्धवराव पाटील निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी उस्मानाबाद परिसरातील २५ ते ३० गावातील नागरिकांनी निवडणूक निधी गोळा केला. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी लोकवर्गणी जमा करणाऱ्यांमध्ये शेतमजुरांची संख्या सर्वाधिक होती. या लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातूनच उद्धवराव पाटील यांच्या उमेदवारी अर्जासह डिपॉझीटही भरण्यात आले. आपल्याच मातीतील ही घटना आज सांंगूनही खरी वाटणार नाही. अशी परिस्थितीच राजकारणात निर्माण झाली आहे. त्यावेळी केवळ विकास आणि विरोधकांचा भ्रष्टाचार हे दोनच प्रचाराचे मुद्दे असायचे, सभाही मोजक्याच व्हायच्या. भाषणामध्ये टिका असायची परंतु ठोस पुराव्यासह. आज निवडणुकीचा प्रचार आणि प्रचाराची साधने बदलली असून, राजकारणाचे तंत्रही बदलले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्ता ही संकल्पनाच बाद होत असल्याचे चित्र आहे. किंबहुना सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविणेच अशक्य होवून बसले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षात सुरु आहे. या प्रक्रियेत आता सर्वाधिक महत्व आहे ते निवडून येण्याच्या क्षमतेला. त्यापाठोपाठ दुसरा प्रश्न असतो तो निवडणुकीत खर्च किती करणार? या दोन्ही प्रश्नावरच वर्षानुवर्ष एकनिष्ठपणे पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची विकेट पडत आहे.