शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

बंडखोरी, गटबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: April 26, 2015 01:01 IST

औरंगाबाद : बंडखोरी आणि गटबाजीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असून बंडखोरी आणि गटबाजीमुळे सेनेचे ज्या वॉर्डात नुकसान झाले,

औरंगाबाद : बंडखोरी आणि गटबाजीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असून बंडखोरी आणि गटबाजीमुळे सेनेचे ज्या वॉर्डात नुकसान झाले, तेथील सर्व पदाधिकारी बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. संघटनेत मोठे फेरबदल होणार विचाराधीन असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सागितले. तर भाजपने १६ बंडखोरांवर कारवाई केली असून त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी देण्याचे आमिष दाखवून २ लाख सदस्य नोंदणीचा टप्पा कार्यकर्त्यांना उन्हा-तान्हात फि रून करून घेतला. परंतु मनपा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी पाहता त्यांना सदस्य नोंदणी एवढी मतेही मिळाली नसली तरी भाजपच्या १५ वरून २३ जागा निवडून आल्या. भाजपच्या ८ जागा वाढल्या आहेत. तर शिवसेनेच्या ३० वरून २८ जागा आल्या आहेत. मागच्या वेळच्या तुलनेत २ जागा सेनेच्या घटल्या आहेत.एमआयएमसारख्या विरोधी पक्षाशी सेनेचा मनपात सामना होणार आहे. अपक्षांना सोबत घेऊन भाजप मोठा भाऊ होतो की सेनेच्या शब्दावर विश्वास ठेवून सेनेकडे अपक्ष वळतात, याकडे आता लक्ष लागले आहे. पुंडलिकनगरमध्येदेखील अपक्ष उमेदवार लक्ष्मी लुटे यांनी सेनेच्या मीना गायके यांची पुरती दमछाक केली होती. संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीच पुंडलिकनगरविरुद्ध हनुमाननगर, अशी लढत जन्माला घातली; परंतु ज्येष्ठ शिवसैनिक वत्सला राऊत, नीळकंठ मुसने, सूर्यकांत जायभाये, बापू कवळे यांनी परिश्रम घेऊन पुंडलिकनगरची जागा राखली.खुल्या प्रवर्गामुळे गायके यांची जागा पक्षाकडून भांडून घेण्यात आली होती; परंतु खुल्या प्रवर्गाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रचारात ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे अतिशय काठावर ती जागा निवडून आली. बाळकृष्णनगरमध्ये महापौर कला ओझा यांचे काम पदाधिकाऱ्यांनीच केले नाही. गजानननगर वॉर्डातदेखील पक्ष पदाधिकाऱ्यांनी आत्माराम पवार यांचे काम केले नाही. न्यायनगरमध्ये गजानन मनगटे यांनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली नाही. विद्यानगरमधून राजू वैद्य यांना सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली. विश्रांतीनगरमध्ये प्रमोद राठोड यांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला. केवळ पक्ष आणि काही मोजक्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांच्या जिवावर या जागा निवडून आल्या आहेत.१गुलमंडीतून सचिन खैरे पडले. बाळकृष्णनगरमधून महापौर कला ओझा यांना बंडखोरी आणि पक्षातील गद्दारांमुळे तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. मयूरनगरमधून वंदना इधाटे पडल्या. पहाडसिंगपुरा येथून अनिल भिंगारे पराभूत झाले. नंदनवन कॉलनीतून चारुलता मगरे तर जयसिंगपुऱ्यातून विलास संभाहारे, काचीवाड्यातून रंजना लिंगायत, नागेश्वरवाडीतून विनायक देशमुख, संजयनगरमधून सुवर्णा जेजूरकर हे गटबाजीमुळे पराभूत झाले. आविष्कार कॉलनीतून सोपान बांगर हे भाजपच्या बंडखोरीमुळे पडले. पदमपुऱ्यातील संजय बारवाल यांना बंडखोर गजानन बारवाल यांनी धूळ चारली. रमानगरची जागा भाजपमधील गटबाजीमुळे पडली. विष्णूनगरमध्येदेखील तेच झाले. ठाकरेनगरमध्ये सेनेच्या दीपाली गायकवाड यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मीरा चव्हाण पडल्या. ३अंबिकानगरमध्ये सेनेच्या बंडखोरामुळे रामचंद्र ठुबे पडले. कामगार कॉलनीतून भाजपचे बळीराम कदम बंडखोरीमुळे पडले. भारतनगरमध्ये सेनेचे दिग्विजय शेरखाने बंडखोरीमुळे पडले. कांचनवाडीतून अनिता घोडेले, तर मयूरबन कॉलनीतून स्वाती जोशी या गटबाजी आणि बंडखोरीमुळे पराभूत झाल्या.