शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

निलंबन आदेशानंतरही कारवाई थंड बस्त्यात

By admin | Updated: July 1, 2017 23:45 IST

परभणी : मानवत तालुका कृषी विभागांतर्गत २०१० ते २०१४ या काळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी,

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानवत तालुका कृषी विभागांतर्गत २०१० ते २०१४ या काळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी, असा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना तीन महिन्यांपूर्वी देऊनही या कार्यालयाने कारवाई न करता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अडगळीत टाकला आहे.माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशमुख यांनी मानवत तालुका कृषी विभागांतर्गत २०१० ते २०१४ या काळात झालेल्या जल व मृद्संधारण कामाच्या गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. यामध्ये एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत आंबेगाव येथील १४ कामे, सावळी येथील १२, खरबा येथील ९ गटांमध्ये ढाळीचे बांध, बंदिस्तीचे व चार गटांमध्ये शेततळ्याची कामे, ताडबोरगाव येथील १३ गटांमधील कामे, कोथाळा येथील दहा गटांमधील कामे, कोल्हा येथील दोन, नरळद येथील दोन याव्यतिरिक्त एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत हत्तलवाडी, सावरगाव, देऊळगाव आवचार, रुढी या गावांमध्ये कामे झाली, परंतु या कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. त्यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे या विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यामुळे विभागप्रमुख या नात्याने त्यांनी या प्रकरणातील तक्रारीच्या अनुषंगाने विहित कालावधीत चौकशी पूर्ण करुन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करुन १५ दिवसांत चौकशी प्रथम प्राधान्याने पूर्ण करावी, असे आदेश २९ मार्च २०१७ रोजी दिले होते.हा आदेश देऊन तीन महिने उलटूनही या प्रकरणातील दोषींवर अद्याप जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे़