शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

रस्ते दुरुस्तीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 23:52 IST

परभणी : विधानमंडळ समितीच्या दौऱ्यात जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाल्याची बाब अधोरेखित झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानमंडळ समितीच्या दौऱ्यात जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाल्याची बाब अधोरेखित झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या करीता जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना ‘अ‍ॅक्शनप्लॅन’ तयार करुन तो समितीसमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समितीचे प्रमुख आ.उदय सामंत यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.राज्य विधानमंडळ समिती ५ व ६ जुलै असे दोन दिवस परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी समितीने महसूल, गौण खनिज, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर विविध ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. त्यानंतर भेटी दिलेल्या ठिकाणांच्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी गुरुवारी बैठक घेतली. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे प्रमुख आ.उदय सामंत म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती भयावह आहे. १५ कि.मी.रस्त्यासाठी ४५ मिनिटे प्रवास करण्यासाठी लागतात. ही बाब समितीच्या दौऱ्यात प्रकर्षाने जाणवली. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत ‘अ‍ॅक्शनप्लॅन’ तयार करण्याचे आदेश दिले असून हा अ‍ॅक्शनप्लॅन जिल्हाधिकारी समितीसमोर ठेवतील व तो मंजूर केला जाईल. गंगाखेड येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, या दृष्टीकोनातून योग्य ती मदत करण्याचे राज्य शासनाचे सूचविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर असलेल्या रस्त्यावर पूल नसल्याने रेल्वे आल्यानंतर फाटकावर बराचवेळ वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते. यासाठी विशेष बाब म्हणून प्रत्येक ठिकाणच्या रस्त्यावर रेल्वे पूल उभारावा, असे मुख्यमंत्र्यांकडे सूचविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथील पुलाचे काम १९९७ साली सुरु झाले. कंत्राटदारामुळेच या कामास वेळ लागला आहे. सदरील कंत्राटदार याबाबत जिल्हा न्यायालयात गेला आहे. त्या विरोधात शासन उच्च न्यायालयात जाईल व या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. परभणीतील पाणीपुरवठा योजनेचीही चौकशी केली जाणार असून जिल्ह्याच्या विकासाचा निधी वाढविला जाईल. पोखर्णी येथील नृसिंह मंदिर, पाथरी येथील साईबाबांचे जन्मस्थळ, गंगाखेड येथील संत जनाबाई यांचे मंदिर, पालम तालुक्यातील जांबूळबेट ही धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळांचा दर्जा वाढवून त्यांचा विकास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. समितीने दिलेल्या आदेशानुसार विकासकामांचा आढावा घेऊन याबाबतचा अहवाल दर महिन्याला सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचेही दौऱ्यात दिसून आल्याचे ते म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव आदींची उपस्थिती होती.