शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

कॅरिबॅग विक्रेत्यांवर मनपाची कारवाई

By admin | Updated: December 17, 2015 00:11 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता. मनपाच्या इशाऱ्यानंतरही शहरात राजरोसपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगची विक्री सुरूच होती. बुधवारी सायंकाळी अचानक कारवाईचा बडगा उगारला. अंगुरीबाग परिसरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून दीडशे किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगवर बंदी घातलेली आहे. शहरात सर्रासपणे कॅरिबॅगचा वापर सुरू आहे. शहरात चारशे ते पाचशे टन कचरा दररोज जमा होतो. यामध्ये सर्वात जास्त कॅरिबॅगच असतात. शासनाने बंदी घातलेली असतानाही कॅरिबॅग वापरणे सुरूच होते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगमुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक नाल्यांचा प्रवाह तुंबणे, ड्रेनेजलाईन चोकअप होण्याबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याने मनपाच्या वाहनांवरही लोड वाढला होता. त्यामुळे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्लास्टिक कचऱ्यासाठी वारंवार प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, प्रशासन जागचे हलले नाही. सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर चार दिवसांत प्लास्टिक कचरा कमी करण्याचा निर्णय घेतला. प्लास्टिक बॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगच्या स्टॉकची विल्हेवाट लावा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आज नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांना प्लास्टिक कॅरिबॅगची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सुनील केंद्रेकर यांनी दिले. सूर्यवंशी यांनी तातडीने पाच कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मोतीकारंजा, पानदरिबा भागात धाव घेतली.