शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कॅरिबॅग विक्रेत्यांवर मनपाची कारवाई

By admin | Updated: December 17, 2015 00:11 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता. मनपाच्या इशाऱ्यानंतरही शहरात राजरोसपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगची विक्री सुरूच होती. बुधवारी सायंकाळी अचानक कारवाईचा बडगा उगारला. अंगुरीबाग परिसरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून दीडशे किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगवर बंदी घातलेली आहे. शहरात सर्रासपणे कॅरिबॅगचा वापर सुरू आहे. शहरात चारशे ते पाचशे टन कचरा दररोज जमा होतो. यामध्ये सर्वात जास्त कॅरिबॅगच असतात. शासनाने बंदी घातलेली असतानाही कॅरिबॅग वापरणे सुरूच होते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगमुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक नाल्यांचा प्रवाह तुंबणे, ड्रेनेजलाईन चोकअप होण्याबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याने मनपाच्या वाहनांवरही लोड वाढला होता. त्यामुळे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्लास्टिक कचऱ्यासाठी वारंवार प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, प्रशासन जागचे हलले नाही. सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर चार दिवसांत प्लास्टिक कचरा कमी करण्याचा निर्णय घेतला. प्लास्टिक बॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगच्या स्टॉकची विल्हेवाट लावा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आज नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांना प्लास्टिक कॅरिबॅगची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सुनील केंद्रेकर यांनी दिले. सूर्यवंशी यांनी तातडीने पाच कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मोतीकारंजा, पानदरिबा भागात धाव घेतली.