शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कॅरिबॅग विक्रेत्यांवर मनपाची कारवाई

By admin | Updated: December 17, 2015 00:11 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपाने आठ दिवसांपूर्वीच कॅरिबॅगविक्रेते आणि उत्पादकांना कारवाईचा इशारा दिला होता. मनपाच्या इशाऱ्यानंतरही शहरात राजरोसपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगची विक्री सुरूच होती. बुधवारी सायंकाळी अचानक कारवाईचा बडगा उगारला. अंगुरीबाग परिसरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून दीडशे किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगवर बंदी घातलेली आहे. शहरात सर्रासपणे कॅरिबॅगचा वापर सुरू आहे. शहरात चारशे ते पाचशे टन कचरा दररोज जमा होतो. यामध्ये सर्वात जास्त कॅरिबॅगच असतात. शासनाने बंदी घातलेली असतानाही कॅरिबॅग वापरणे सुरूच होते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगमुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे. शहरातील अनेक नाल्यांचा प्रवाह तुंबणे, ड्रेनेजलाईन चोकअप होण्याबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याने मनपाच्या वाहनांवरही लोड वाढला होता. त्यामुळे नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्लास्टिक कचऱ्यासाठी वारंवार प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, प्रशासन जागचे हलले नाही. सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर चार दिवसांत प्लास्टिक कचरा कमी करण्याचा निर्णय घेतला. प्लास्टिक बॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगच्या स्टॉकची विल्हेवाट लावा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आज नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांना प्लास्टिक कॅरिबॅगची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सुनील केंद्रेकर यांनी दिले. सूर्यवंशी यांनी तातडीने पाच कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मोतीकारंजा, पानदरिबा भागात धाव घेतली.