शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

४ महिन्यांत पकडले ६४ हजार नियमतोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:58 IST

चार महिन्यांत नियम मोडून वाहने पळविणाºया तब्बल ६४ हजार ३६४ वाहनचालकांना शहर वाहतूक शाखेने पकडून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात वाहतूक नियमांची ऐसीतैसी करीत वाहने पळविणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चार महिन्यांत नियम मोडून वाहने पळविणाºया तब्बल ६४ हजार ३६४ वाहनचालकांना शहर वाहतूक शाखेने पकडून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. या वाहनचालकांकडून १ कोटी ९३ लाख ३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, वाहतूक नियम तोडून वाहने पळविल्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो. यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. एवढेच नव्हे, तर होर्डिंग लावून प्रबोधन केले जाते. मात्र काही लोकांना वाहतूक नियम मोडण्याची सवयच झाली आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाला पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिले. या आदेशानुसार १ मे ते ३१ आॅगस्ट या चार महिन्यांत नियम मोडून वाहने पळविणाºया ६४ हजार ३६४ वाहनचालकांना पकडण्यात आले. या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून तब्बल १ कोटी ९३ लाख ३ हजार ५०० रुपये वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, सिडको, छावणी आणि वाळूज या वाहतूक विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.