शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे आज आगमन

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : चातुर्मासानिमित्त आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे.

औरंगाबाद : चातुर्मासानिमित्त आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराजांनी आजपर्यंत २८५ पुस्तके लिहिली आहेत. नागपूर, रायपूर येथील चातुर्मास संपवून हजारो कि.मी.चा प्रवास पायी प्रवास करीत महाराजांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे. सकाळी ६ वाजता केम्ब्रिज शाळेजवळील जकात नाका येथे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ६.३० वाजता धूत हॉस्पिटलपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराजांसोबत आचार्य पद्मसुंदरसुरीश्वर म.सा., पन्यास युगसुंदर विजयजी म.सा. आदी १२ ठाणा व १८ साध्वीगण येणार आहेत. महाराजांचे प्रथमच औरंगाबादेत आगमन होत असल्याने भव्य शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता चिकलठाणा परिसरातील प्रकाशचंद बाफना यांच्या निवास्थानी शोभायात्रेची सांगता होणार आहे. यानंतर ८.४५ ते १० वाजेदरम्यान आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज व गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन संघ सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. परिवर्तन प्रवचनमालेचे आयोजन शहरातील विविध भागांत २ ते २९ जून आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन प्रवचनमालाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ व ४ जूनदरम्यान रोजी बिग बाझार हॉल, जालना रोड. ५ व ६ रोजी बालाजी मंगल कार्यालय, बालाजीनगर. ७ ते ९ जून चंद्रसागर धर्मशाळा, शहागंज. १० ते १२ जूनदरम्यान जोहरीवाडा, रंगारगल्ली. १३ ते १५ जूनदरम्यान महावीर भवन, कुंभारवाडा. १६ ते १८ जूनदरम्यान अग्रसेन भवन, पानदरिबा येथे प्रवचन होणार आहे. १९ ते २० जूनदरम्यान तिवारी मंगल कार्यालय, वेदांतनगर. २१ ते २४ जूनदरम्यान वर्धमान रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क. २५ जून रोजी अग्रसेन भवन, सिडको येथे प्रवचन होणार आहे. २९ जून रोजी रोजी चातुर्मास प्रवेश सिडको एन-३ येथील केसरबाग मंगल कार्यालयात होणार आहे.