शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अविश्वासावर आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: September 24, 2016 00:30 IST

औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

औरंगाबाद : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यानंतर येथील ‘राजकारण’ गरम झाले आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सध्या तरी विरोधकांचे पारडे जड दिसत आहे. गुरुवारी भाजपच्या संचालकांनी काँग्रेसचे दोन व व्यापारी संचालक दोन, अशा चार जणांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. बाहेरगावी असलेले सभापती संजय औताडे जाधववाडीतील कृउबाच्या कार्यालयात आले. आपल्या सहकारी संचालकांसोबत त्यांनी चर्चा केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. आमचे संचालक फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ झाला असून, या कट-कारस्थानामागे थेट विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हात असल्याचा आरोप औताडे यांनी केला. यावर उपसभापती भागचंद ठोबरे म्हणाले की, सर्व संचालकच सभापतींच्या मनमानी कामकाजाला वैतागले होते. यामुळे अविश्वास प्रस्ताव आणला असून, काँग्रेसचे आणखी तीन संचालक आमच्या संपर्कात असल्याचे सांगून त्यांनी बॉम्बगोळा टाकला. भाजपचे संचालक दामोदर नवपुते म्हणाले की, हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल बोलण्याची औताडे यांची लायकी नाही. संचालकांना फोडायचे असते तर सुरुवातीलाच ते केले असते. तेव्हा एकाच संचालकाची आम्हाला गरज होती. औताडे सभापती झालेच नसते, असाही टोला त्यांनी लगावला. व्यापारी प्रतिनिधी संचालक प्रशांत सोकिया यांनी सांगितले की, २००७ मध्ये होलसेल किराणा व्यापाऱ्यांसाठी जाधववाडीत प्लॉट देण्याचा निर्णय झाला होता. त्याच मुद्द्यावर आम्ही संजय औताडे यांना पाठिंबा दिला. वर्ष पूर्ण झाले, पण कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने अखेर आम्ही त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर सह्या केल्या. कृउबा समितीवर २०१५ मध्ये काँग्रेसचे ७ उमेदवार व भाजपचे ७ उमेदवार निवडून आले होते. व्यापारी प्रतिनिधी २ व १ हमाल-मापाडी संचालक व १ अपक्ष म्हणून संजय औताडे निवडून आले होते. औताडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व हमाल-मापाडी संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी त्यांना पाठिंबा दिला. २ व्यापाऱ्यांनी भाजपला साथ दिली. यामुळे काँग्रेसचे ९ संचालक व भाजपचे ९ संचालक, अशा दोन्ही बाजू समसमान झाल्या होत्या. सभापतीपदासाठी चिठ्ठी टाकण्यात आली. त्याद्वारे सभापतीची माळ काँग्रेसचे संजय औताडे यांच्या गळ्यात पडली. उपसभापती भाजपचे भागचंद ठोंबरे झाले. यास वर्षभराचा कालावधी उलटला. गुरुवारी काँग्रेसच्या सभापतीच्या विरोधात भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. भाजपने काँग्रेसच्या दोन संचालकांना फोडले. यामुळे आता भाजपचे संख्याबळ ११ झाले आहे. आणखी काँग्रेसचे दोन संचालक संपर्कात असल्याचा दावा उपसभापती भागचंद ठोंबरे यांनी केला आहे. हमाल-मापाडी संचालक कीर्तिशाही काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे सध्या तरी विरोधकांचे पारडे जड दिसत आहे.