शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अहवालानुसार माध्यमिक शाळांची गुणवत्ता कमी

By admin | Updated: July 13, 2016 00:39 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. संपूर्ण राज्यातील एकाही शाळेची गुणवत्ता आतापर्यंत ७० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकली नाही. माध्यमिक शाळांची गुणवत्ता किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून आॅगस्टपासूनच प्राथमिक शाळांप्रमाणे माध्यमिक शाळांमध्येही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शनिवारी औरंगाबादेत राज्यभरातील सर्व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच सर्व शिक्षण उपसंचालकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक नामदेव जरग हे देखील उपस्थित होते. या कार्यशाळेत माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेबद्दल शिक्षण सचिव नंदकुमार यांनी चिंता व्यक्त केली. गुणवत्ता सुधारायची असेल, तर प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा उपक्रम जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळांमध्येही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्याबाबत सूतोवाच करण्यात आले. प्रामुख्याने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांमध्ये कमी गुणवत्ता आहे. राज्यातील काही भागात माध्यमिक शाळांची या विषयातील गुणवत्ता कुठे ५३ टक्के, कुठे ६५ टक्के तर कुठे ७० टक्के एवढीच आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक कुठेही गुणवत्ता नाही.किमान ७५ टक्क्यांपर्यंत माध्यमिक शाळांची गुणवत्ता नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी सुरुवातीला तालुक्यातील २-३ शाळांची गुणवत्ता विकसित केली जाईल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या या शाळा ‘मदर्स स्कूल’ म्हणून संबोधल्या जातील. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल. त्यानंतर या मदर्स स्कूल तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करतील. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच जारी होईल.