शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अहवालानुसार माध्यमिक शाळांची गुणवत्ता कमी

By admin | Updated: July 13, 2016 00:39 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे

औरंगाबाद : केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. संपूर्ण राज्यातील एकाही शाळेची गुणवत्ता आतापर्यंत ७० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकली नाही. माध्यमिक शाळांची गुणवत्ता किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वाढली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून आॅगस्टपासूनच प्राथमिक शाळांप्रमाणे माध्यमिक शाळांमध्येही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शनिवारी औरंगाबादेत राज्यभरातील सर्व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच सर्व शिक्षण उपसंचालकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक नामदेव जरग हे देखील उपस्थित होते. या कार्यशाळेत माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेबद्दल शिक्षण सचिव नंदकुमार यांनी चिंता व्यक्त केली. गुणवत्ता सुधारायची असेल, तर प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा उपक्रम जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळांमध्येही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्याबाबत सूतोवाच करण्यात आले. प्रामुख्याने इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांमध्ये कमी गुणवत्ता आहे. राज्यातील काही भागात माध्यमिक शाळांची या विषयातील गुणवत्ता कुठे ५३ टक्के, कुठे ६५ टक्के तर कुठे ७० टक्के एवढीच आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक कुठेही गुणवत्ता नाही.किमान ७५ टक्क्यांपर्यंत माध्यमिक शाळांची गुणवत्ता नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी सुरुवातीला तालुक्यातील २-३ शाळांची गुणवत्ता विकसित केली जाईल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या या शाळा ‘मदर्स स्कूल’ म्हणून संबोधल्या जातील. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल. त्यानंतर या मदर्स स्कूल तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करतील. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच जारी होईल.