शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

अपघाताने रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 12, 2014 00:12 IST

विठ्ठल भिसे, पाथरी पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ या रस्त्यावरून महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या होणेही मुश्कील झाले आहे़

विठ्ठल भिसे, पाथरीपाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ या रस्त्यावरून महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या होणेही मुश्कील झाले आहे़ प्रवाशांच्या रेट्यामुळे महामंडळाच्या बसेस सुरू राहतात खऱ्या़ परंतु, गुंजजवळ महामंडळाची बस रस्त्यावरून खड्डे चुकविताना रस्त्याच्या बाजुच्या खड्डयात कोसळून अपघात झाला़ यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ पाथरी तालुक्यात ग्रामीण भागातून शहराला जोडणारे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत: खराब झालेले आहेत़ दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किरकोळ निधी उपलब्ध होतो़ यातून दुरुस्ती केल्या जाते़ परंतु, रस्त्यांची अवस्था मात्र कायमची दुरुस्त होताच नाही़ पर्यायाने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते़ तसेच दळणवळणासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्याचा शेती मालावरही परिणाम होऊ लागला आहे़ गोदाकाठच्या भागामध्ये युती शासनाच्या काळात शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे डांबरीकरणाने पूर्ण झाली़ त्यानंतर मात्र या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आज हे रस्ते पूर्णत: उखडून गेले आहेत़ महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागात धावतात खऱ्या़ परंतु, खराब रस्त्यामुळे अनेक वेळा बसेस मधेच बंद पडतात़ यामुळे प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते़ महामंडळाच्या बसेस अगोदरच नादुरुस्त आणि त्यातच खराब रस्ते़ यामुळे या रस्त्यावर महामंडळाच्या बसेसच्या रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली़ पाथरी- उमरा रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी गुंज गावानजीक महामंडळाची बस खराब रस्त्यामुळे खड्डयात कोसळून अपघात झाला़ या अपघातात मोठी जिवीत हानी झाली नसली तरी यामुळे रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आता तरी लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागाच्या रस्त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे़ बसफेऱ्या होतात कपातपाथरी-उमरा ही बस अनेक वर्षांपासून धावते़ या बसला मोठे उत्पन्नही आहे़ हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने गेल्या वर्षभरात महामंडळाने अनेकवेळा या मार्गावरील या बसच्या फेऱ्यांमध्ये कपात केली़ पर्यायाने या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयींचा सामनाही करावा लागला़ शहरामध्ये शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसोबतच विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे़ खराब रस्त्यामुळे महामंडळाच्या बसेस बंद झाल्या तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही उपस्थित होणार आहे़ मानव विकासच्या बसेवर परिणामराज्य शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी बसेसची व्यवस्था केली खरी़ परंतु, या तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते खराब झाल्याने आणि महामंडळाच्या बसेसला खराब रस्त्यामुळे अपघात होत असल्याने मानव विकासच्या बसेवरही याचा परिणाम जानवणार आहे़ ग्रामीण भागाला जोडणारे बहुतांश रस्ते खराब आहेत़ या रस्त्यांवर गाडे चालविणे महामंडळाच्या चालकांना मोठी कसरत करावी लागते़ बऱ्याच वेळा चालक खराब रस्त्यामुळे या मार्गावरून गाड्या नेण्यासही टाळाटाळ करतात़