शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगावधानी विशेष पोलीस अधिका-यांनी वाचवले रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:23 IST

चार दिवसावर दिवाळीचा सण आला आणि आठ दिवसापासून रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ)यश आले.

ठळक मुद्दे वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरूळावर झोपला होता रिक्षाचालक भविष्याची चिंता सतावत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतल्याचे रिक्षाचालकाने सांगितले साडेअकरा वाजेच्या सुमारास एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, अशोक सोजे यांच्या ते नजरेस पडताच त्यांनी रिक्षाचालकास रूळावरून उठवले

औरंगाबाद, दि.१४ : चार दिवसावर दिवाळीचा सण आला आणि आठ दिवसापासून रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ)यश आले. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली.

सुरेश नामदेव(वय ५०,रा.हनुमानगर, नावे बदलले आहे)हे रिक्षाचालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. एका मुलीचा विवाह झालेला आहे तर दुसरी नववीत शिकत आहे. मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी जवळ दोन पैसेही नसल्याने ते रोज सकाळीच रिक्षा व्यवसायासाठी बाहेर नेत. नियमाप्रमाणे प्रवासी वाहतुक करण्यासाठी ते रिक्षा थांब्यावर थांबतात. मात्र गेल्या काही दिवसापासून बारा ते चौदा तास काम करूनही त्यांना म्हणावे तसे प्रवासी मिळत नव्हते. प्रवासी न मिळाल्याने त्यांना दैनंदिन रोजंदारीही काढणे दुर होत होते. त्यात त्यांची जुनी रिक्षा असल्याने त्यात नेहमी बिघाड होतो. रिक्षा दुरूस्तीवर पैसे खर्च करावे अथवा दैनंदिन घरखर्च भागवावा, या विवंचनेत ते होते.

एवढे कष्ट करूनही दोन पैसे शिल्लक राहत  नसल्याने ते निराश झाल्याने त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत काढली. पत्नीने त्यांना हिम्मत दिली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृद्ध वडिलांना जेवू घातल्यानंतर ते घराबाहेर पडले. पुंडलिकनगर येथून ते चालत-चालत थेट संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली गेले. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रेल्वेरूळावर जाऊन झोपले. साडेअकरा वाजेच्या सुमारास एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, अशोक सोजे यांना ते नजरेस पडले. त्यांनी त्यांना रूळावरून उठवून त्यांची विचापुस केली तेव्हा त्यांनी रिक्षाचा व्यवसाय होत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरूळावर झोपल्याचे सांगितले. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भविष्याची चिंता सतावत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांची गोर्डे पाटील,  अ‍ॅॅड. रामदास भोसले, नरेंद्र आडे, स्वराज गोर्डे, राहुल सोनकांबळे यांनी त्यांची समजूत आणि त्यांच्या साला आणि नातेवाईकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.

रेल्वेसमोर उडी मारण्याची हिम्मत झाली नाहीतत्पूर्वी त्यांच्यासमोरून तीन रेल्वेगाड्या गेल्या. प्रत्येक गाडीसमोर उडी मारून जीवनयात्रा संपवावी,या उद्देशाने ते तिकडे गेले. परंतु रेल्वेसमोर उडी मारण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. शेवटी त्यांनी रेल्वेरूळावर झोपण्याचा निर्णय घेतला.