शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

शेतकरी विमा अपघात योजनेलाच ‘अपघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

औरंगाबाद : अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ...

औरंगाबाद : अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू झाली; पण विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे विम्याची प्रकरणे वेळेवर मंजूर होत नसल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागील वर्षात ११० प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी फक्त १७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

शेतात काम करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, नदीला पूर येणे, सर्पदंश होणे, विंचूदंश होणे, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीला झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे हाल होतात. या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरणारी आहे. सरकारचा हेतू चांगला आहे; पण अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत गती नसल्याने योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

चौकट

जिल्ह्यात मागील वर्षी किती प्रस्ताव दाखल

दाखल प्रस्ताव - ११०

मंजूर प्रस्ताव - १७

नामंजूर प्रस्ताव - ४

कार्यवाही सुरू - १४

प्रलंबित प्रस्ताव - ७५

-----

चौकट

मिळते २ लाखांची आर्थिक मदत

शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतात काम करताना विजेच्या धोक्याने, सर्पदंश, पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या वारसांना विमा कंपन्यांकडून दिली जाते.

चौकट

विम्यापोटी कंपनीस शासनाने दिले ९८ कोटी

राज्यातील ३.०४ कोटी शेतकऱ्यांच्या विमा संरक्षणापोटी सरकारने ९८ कोटींची रक्कम विमा कंपनीत भरली आहे. यात युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी लि. व जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीचा समावेश आहे. मात्र, प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या तुलनेत प्रत्यक्षात मंजूर होणारे प्रस्ताव अत्यल्प आहे.