शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

शेतकरी विमा अपघात योजनेलाच ‘अपघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

औरंगाबाद : अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ...

औरंगाबाद : अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू झाली; पण विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे विम्याची प्रकरणे वेळेवर मंजूर होत नसल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागील वर्षात ११० प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी फक्त १७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

शेतात काम करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, नदीला पूर येणे, सर्पदंश होणे, विंचूदंश होणे, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीला झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे हाल होतात. या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरणारी आहे. सरकारचा हेतू चांगला आहे; पण अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत गती नसल्याने योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

चौकट

जिल्ह्यात मागील वर्षी किती प्रस्ताव दाखल

दाखल प्रस्ताव - ११०

मंजूर प्रस्ताव - १७

नामंजूर प्रस्ताव - ४

कार्यवाही सुरू - १४

प्रलंबित प्रस्ताव - ७५

-----

चौकट

मिळते २ लाखांची आर्थिक मदत

शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतात काम करताना विजेच्या धोक्याने, सर्पदंश, पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या वारसांना विमा कंपन्यांकडून दिली जाते.

चौकट

विम्यापोटी कंपनीस शासनाने दिले ९८ कोटी

राज्यातील ३.०४ कोटी शेतकऱ्यांच्या विमा संरक्षणापोटी सरकारने ९८ कोटींची रक्कम विमा कंपनीत भरली आहे. यात युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी लि. व जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीचा समावेश आहे. मात्र, प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या तुलनेत प्रत्यक्षात मंजूर होणारे प्रस्ताव अत्यल्प आहे.