शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

शेतकरी विमा अपघात योजनेलाच ‘अपघात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

औरंगाबाद : अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ...

औरंगाबाद : अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाइकांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू झाली; पण विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे विम्याची प्रकरणे वेळेवर मंजूर होत नसल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागील वर्षात ११० प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी फक्त १७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

शेतात काम करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, नदीला पूर येणे, सर्पदंश होणे, विंचूदंश होणे, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीला झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे हाल होतात. या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरणारी आहे. सरकारचा हेतू चांगला आहे; पण अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत गती नसल्याने योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

चौकट

जिल्ह्यात मागील वर्षी किती प्रस्ताव दाखल

दाखल प्रस्ताव - ११०

मंजूर प्रस्ताव - १७

नामंजूर प्रस्ताव - ४

कार्यवाही सुरू - १४

प्रलंबित प्रस्ताव - ७५

-----

चौकट

मिळते २ लाखांची आर्थिक मदत

शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतात काम करताना विजेच्या धोक्याने, सर्पदंश, पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या वारसांना विमा कंपन्यांकडून दिली जाते.

चौकट

विम्यापोटी कंपनीस शासनाने दिले ९८ कोटी

राज्यातील ३.०४ कोटी शेतकऱ्यांच्या विमा संरक्षणापोटी सरकारने ९८ कोटींची रक्कम विमा कंपनीत भरली आहे. यात युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी लि. व जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीचा समावेश आहे. मात्र, प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या तुलनेत प्रत्यक्षात मंजूर होणारे प्रस्ताव अत्यल्प आहे.