शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

महा-ई सेवा केंद्रातील प्रमाणपत्रे बँका स्वीकारेना

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

जालना : प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र बंद करून शहरात सात महा-ई सेवा केंद्रे स्थापन केली.

जालना : प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र बंद करून शहरात सात महा-ई सेवा केंद्रे स्थापन केली. परंतु या केंद्रातील डिजीटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र बँका व वरिष्ठ महाविद्यालयांकडून स्वीकारले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची अडवणूक होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सध्या सेतू सुविधा केंद्र बंद असले तरी तेथे येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. केंद्राला लागलेले टाळे पाहून नागरिक कुणाला तरी विचारणा करतात, आता सेतू कुठे ? असा सवाल करतात. कारण सेतू केंद्रासमोर ते बंद झाल्याबाबतची किंवा महा-ई सेवा केंद्रे कुठे आहेत, याविषयीची ठळकपणे दिसणारा फलक लावलेला नाही. शहरात मध्यवस्तीत किंवा कानाकोपऱ्यात महा-ई सेवा केंद्रे शोधत नागरिक तेथे जातात. उत्पन्नाचे किंवा रहिवासी प्रमाणपत्र तेथून घेतल्यानंतर बँका किंवा महाविद्यालयांमध्ये ते सादर केले तर ही प्रमाणपत्रे स्वीकारली जात नाहीत. कारण त्यावर डिजीटल स्वाक्षरी असते. नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाजाचा शिक्का, अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसते. ही प्रमाणपत्रे न स्वीकारल्यामुळे नागरिकांची अडचण होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना प्रमाणपत्रे स्वीकारण्याचे आदेश दिलेले असले तरी देखील अशा प्रकारची अडचण निर्माण होत असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण २७० महा-ई सेवा केंद्रांना मंजुरी असून त्यापैकी २२२ केंद्रे सुरू झालेली आहेत. जालना शहरात सात ठिकाणी महा-ई सेवा केंद्रांची स्थापना १ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. मस्तगड, शिवाजीपुतळा, सिंधीबाजार, जालना तहसील, सिरसवाडी, दरेगाव, इंदेवाडी या ठिकाणी ही केंद्रे आहेत. सेतू सुविधा केंद्राद्वारे नागरिकांना जी सेवा मिळत होती, तीच याही केंद्रामार्फत मिळते. याउलट विजेचे बील, टेलिफोन बील, आॅनलाईन रिझर्व्हेशन इत्यादी सुविधाही येथे दिल्या जातात. या केंद्रात आॅपरेटर व केंद्र चालक अशा दोघांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी २४ जुलै २०१४ रोजी डिजीटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र किंवा परवाने स्वीकारण्यात यावेत, यासंबंधीचे आदेश काढलेले आहेत. ४माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० व २००८ तसेच महाराष्ट्र राज्य ई-गव्हर्मेंट योजना २०११ अन्वये ई-डिस्ट्रीक प्रणाली अंतर्गत डिजीटल सिग्नेचरद्वारे विविध शासकीय योजनेसाठी लागणारे प्रमाणपत्र/ परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.४ही प्रमाणपत्रे महा-ई सेवा केंद्राद्वारे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.