शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

महा-ई सेवा केंद्रातील प्रमाणपत्रे बँका स्वीकारेना

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

जालना : प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र बंद करून शहरात सात महा-ई सेवा केंद्रे स्थापन केली.

जालना : प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र बंद करून शहरात सात महा-ई सेवा केंद्रे स्थापन केली. परंतु या केंद्रातील डिजीटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र बँका व वरिष्ठ महाविद्यालयांकडून स्वीकारले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची अडवणूक होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सध्या सेतू सुविधा केंद्र बंद असले तरी तेथे येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. केंद्राला लागलेले टाळे पाहून नागरिक कुणाला तरी विचारणा करतात, आता सेतू कुठे ? असा सवाल करतात. कारण सेतू केंद्रासमोर ते बंद झाल्याबाबतची किंवा महा-ई सेवा केंद्रे कुठे आहेत, याविषयीची ठळकपणे दिसणारा फलक लावलेला नाही. शहरात मध्यवस्तीत किंवा कानाकोपऱ्यात महा-ई सेवा केंद्रे शोधत नागरिक तेथे जातात. उत्पन्नाचे किंवा रहिवासी प्रमाणपत्र तेथून घेतल्यानंतर बँका किंवा महाविद्यालयांमध्ये ते सादर केले तर ही प्रमाणपत्रे स्वीकारली जात नाहीत. कारण त्यावर डिजीटल स्वाक्षरी असते. नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाजाचा शिक्का, अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसते. ही प्रमाणपत्रे न स्वीकारल्यामुळे नागरिकांची अडचण होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना प्रमाणपत्रे स्वीकारण्याचे आदेश दिलेले असले तरी देखील अशा प्रकारची अडचण निर्माण होत असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण २७० महा-ई सेवा केंद्रांना मंजुरी असून त्यापैकी २२२ केंद्रे सुरू झालेली आहेत. जालना शहरात सात ठिकाणी महा-ई सेवा केंद्रांची स्थापना १ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. मस्तगड, शिवाजीपुतळा, सिंधीबाजार, जालना तहसील, सिरसवाडी, दरेगाव, इंदेवाडी या ठिकाणी ही केंद्रे आहेत. सेतू सुविधा केंद्राद्वारे नागरिकांना जी सेवा मिळत होती, तीच याही केंद्रामार्फत मिळते. याउलट विजेचे बील, टेलिफोन बील, आॅनलाईन रिझर्व्हेशन इत्यादी सुविधाही येथे दिल्या जातात. या केंद्रात आॅपरेटर व केंद्र चालक अशा दोघांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी २४ जुलै २०१४ रोजी डिजीटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र किंवा परवाने स्वीकारण्यात यावेत, यासंबंधीचे आदेश काढलेले आहेत. ४माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० व २००८ तसेच महाराष्ट्र राज्य ई-गव्हर्मेंट योजना २०११ अन्वये ई-डिस्ट्रीक प्रणाली अंतर्गत डिजीटल सिग्नेचरद्वारे विविध शासकीय योजनेसाठी लागणारे प्रमाणपत्र/ परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.४ही प्रमाणपत्रे महा-ई सेवा केंद्राद्वारे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.