शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

कायगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:02 IST

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने अजूनही बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सध्या उसाची लागवड ...

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने अजूनही बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सध्या उसाची लागवड करण्यात व्यस्त आहेत. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत या भागातील शेतकऱ्यांकडून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तर भिवधानोरा, गळनिंब, अगरवाडगाव, धनगरपट्टी, आदी गोदावरी काठावरील गावांत सोयाबीन पेरणीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे.

सद्या सर्वत्र शेत नांगरणीचे काम सुरू असून, शेत तयार करून मे महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश भागातील शेतकरी कापसाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत, तर कृषी विभागानेही हंगामात शेतकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

कृषी विभागाने यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाच दिवस उशिराने म्हणजे १ जूनपासून कृषी सेवा केंद्रांना बियाणे विक्रीसाठी परवानगी दिली आहे. असे असले तरी, लॉकडाऊनमुळे खरिपासाठी बियाणे आणि खते शेतकऱ्याला सहज आणि रास्त भावात उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान कृषी खात्यासमोर आहे.

चौकट

भिवधानोरा परिसरात जवळपास ५० एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली होती. कृषी विभागाने गेल्या हंगामातच पुढील हंगामात लागणारे बियाणे स्वतः तयार करण्याचे नियोजन केले होते. उन्हाळी पिकांमुळे परिसरातील चालू खरीप हंगामातील सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे. हेच बियाणे शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी वापरता येणार आहे.

कोट

शेतकऱ्यांनी कपाशीचीच्या लागवडीची घाई करू नये

६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करू नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केली आणि पाऊस उशिरा पडला तर कापसावर सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव पडण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये. बीजप्रक्रिया करून पिकांची उतारास आडवी पेरणी करावी, पेरणी वेळीच खताचा बेसल डोस द्यावा. मका, सोयाबीन, मूग, आदींची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करावी.

- विष्णू मोरे, मंडळ कृषी अधिकारी.(पूर्व)..

फोटो : कायगाव परिसरात सध्या शेतकऱ्यांची ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. (तारेख शेख)