शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कायगाव परिसरात खरिपाच्या तयारीला वेग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:02 IST

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने अजूनही बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सध्या उसाची लागवड ...

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने अजूनही बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सध्या उसाची लागवड करण्यात व्यस्त आहेत. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत या भागातील शेतकऱ्यांकडून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तर भिवधानोरा, गळनिंब, अगरवाडगाव, धनगरपट्टी, आदी गोदावरी काठावरील गावांत सोयाबीन पेरणीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे.

सद्या सर्वत्र शेत नांगरणीचे काम सुरू असून, शेत तयार करून मे महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश भागातील शेतकरी कापसाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत, तर कृषी विभागानेही हंगामात शेतकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

कृषी विभागाने यंदा गेल्या वर्षीपेक्षा पाच दिवस उशिराने म्हणजे १ जूनपासून कृषी सेवा केंद्रांना बियाणे विक्रीसाठी परवानगी दिली आहे. असे असले तरी, लॉकडाऊनमुळे खरिपासाठी बियाणे आणि खते शेतकऱ्याला सहज आणि रास्त भावात उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान कृषी खात्यासमोर आहे.

चौकट

भिवधानोरा परिसरात जवळपास ५० एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली होती. कृषी विभागाने गेल्या हंगामातच पुढील हंगामात लागणारे बियाणे स्वतः तयार करण्याचे नियोजन केले होते. उन्हाळी पिकांमुळे परिसरातील चालू खरीप हंगामातील सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे. हेच बियाणे शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी वापरता येणार आहे.

कोट

शेतकऱ्यांनी कपाशीचीच्या लागवडीची घाई करू नये

६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करू नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केली आणि पाऊस उशिरा पडला तर कापसावर सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव पडण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये. बीजप्रक्रिया करून पिकांची उतारास आडवी पेरणी करावी, पेरणी वेळीच खताचा बेसल डोस द्यावा. मका, सोयाबीन, मूग, आदींची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करावी.

- विष्णू मोरे, मंडळ कृषी अधिकारी.(पूर्व)..

फोटो : कायगाव परिसरात सध्या शेतकऱ्यांची ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. (तारेख शेख)