शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा ९० लाखांचा आराखडा सादर

By admin | Updated: May 16, 2014 00:12 IST

बदनापूर : तालुक्यात एप्रिल ते जून च्या कालावधीकरीता ९० लाख ९० हजार रूपयांचा पुरक पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे,

 बदनापूर : तालुक्यात एप्रिल ते जून च्या कालावधीकरीता ९० लाख ९० हजार रूपयांचा पुरक पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, मंजुरीकरिता हा आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील आगामी पाणीटंचाईवर चर्चा करण्याकरिता दि. ५ मे रोजी बदनापूर पंचायत समितीमध्ये पाणीटंचाई आराखडा बैठक झाली. त्यामध्ये विविध गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार पंचायत समितीने पुरक पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये चित्तोडा, आन्वी, आसोला, उज्जैनपुरी, कंडारी बु, काजळा, खामगाव, माात्रेवाडी, दावलवाडी, नजीकपांगरी, पिरसावंगी, राजेवाडी शे, रमदुलवाडी, सुंदरनगर, वंजारवाडी, नागठाणा, साखरवाडी, दाबकातांडा, हालदोला अशा एकूण १२ गावे व ७ वाडी-ताड्यावर एकूण १३ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण २२ लाख १० हजार रूपये खर्च येणार आहे. तालुक्यातील ३८ गावे व १९ वाडी-ताड्यावर ४१ लाख रूपये खर्चून ८२ नवीन विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. एका गावात १५ हजार रुपये खर्चून १ जलभंजन करणे, १७ गावे व २ वाडी-ताड्यांमध्ये १४ लाख ४५ हजार रूपये खर्चून १९ नळ योजना विशेष दुरूस्ती, दोन गावांत ६ लाखांची तात्पुरती नळयोजना, १९ गावे व ६ वाड्यातांड्यांमध्ये ७ लाख २० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे अशाप्रकारे तालुक्यातील ८९ गावे व ३४ वाडी-ताड्यांमध्ये एकूण १३७ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच या तालुक्यातील गोकुळवाडी, गोकुळवाडी तांडा, चनेगाव, कडेगाव, माळेगाव, डोंगरगाव दा, बनवाडी, खडकवाडी, बावणे पांगरी, गोकुळनगर तांडा, गारवाडी तांडा, बाजार वाहेगाव, देवगाव, देवगाव तांडा, म्हसला, भातखेडा, साळवेवाडी, रांजणगाव, शेलगाव, सिरसगाव घाटी, कासेवाडी, लालवाडी, वरूडी, वाघ्रुळ दाभाडी, वाघ्रुळ डोंगरगाव, विल्हाडी आदी गावांमध्ये एकही उपाययोजना दाखविलेली नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट व वादळी पावसामुळे रबी पिकांचे व अनेक फळबागांचे करोडो रूपयांचे नुकसान झालेले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश तेथील ग्रामसेवक, तलाठी व कृषि सहाय्यकांना दिले होते. त्यानुसार काही गावांचे पंचनामे येथील तहसील कार्यालयात सादर केले होते. परंतु अनेक गावांमधील शेतकर्‍यांनी पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी ा केल्या होत्या. याविषयी तहसीलदार बालाजी क्षरीरसागर म्हणाले, तालुक्यातील ९ ते १० गावांमधील पंचनाम्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.