शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पाणीटंचाईचा ९० लाखांचा आराखडा सादर

By admin | Updated: May 16, 2014 00:12 IST

बदनापूर : तालुक्यात एप्रिल ते जून च्या कालावधीकरीता ९० लाख ९० हजार रूपयांचा पुरक पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे,

 बदनापूर : तालुक्यात एप्रिल ते जून च्या कालावधीकरीता ९० लाख ९० हजार रूपयांचा पुरक पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, मंजुरीकरिता हा आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील आगामी पाणीटंचाईवर चर्चा करण्याकरिता दि. ५ मे रोजी बदनापूर पंचायत समितीमध्ये पाणीटंचाई आराखडा बैठक झाली. त्यामध्ये विविध गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार पंचायत समितीने पुरक पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये चित्तोडा, आन्वी, आसोला, उज्जैनपुरी, कंडारी बु, काजळा, खामगाव, माात्रेवाडी, दावलवाडी, नजीकपांगरी, पिरसावंगी, राजेवाडी शे, रमदुलवाडी, सुंदरनगर, वंजारवाडी, नागठाणा, साखरवाडी, दाबकातांडा, हालदोला अशा एकूण १२ गावे व ७ वाडी-ताड्यावर एकूण १३ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण २२ लाख १० हजार रूपये खर्च येणार आहे. तालुक्यातील ३८ गावे व १९ वाडी-ताड्यावर ४१ लाख रूपये खर्चून ८२ नवीन विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. एका गावात १५ हजार रुपये खर्चून १ जलभंजन करणे, १७ गावे व २ वाडी-ताड्यांमध्ये १४ लाख ४५ हजार रूपये खर्चून १९ नळ योजना विशेष दुरूस्ती, दोन गावांत ६ लाखांची तात्पुरती नळयोजना, १९ गावे व ६ वाड्यातांड्यांमध्ये ७ लाख २० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे अशाप्रकारे तालुक्यातील ८९ गावे व ३४ वाडी-ताड्यांमध्ये एकूण १३७ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच या तालुक्यातील गोकुळवाडी, गोकुळवाडी तांडा, चनेगाव, कडेगाव, माळेगाव, डोंगरगाव दा, बनवाडी, खडकवाडी, बावणे पांगरी, गोकुळनगर तांडा, गारवाडी तांडा, बाजार वाहेगाव, देवगाव, देवगाव तांडा, म्हसला, भातखेडा, साळवेवाडी, रांजणगाव, शेलगाव, सिरसगाव घाटी, कासेवाडी, लालवाडी, वरूडी, वाघ्रुळ दाभाडी, वाघ्रुळ डोंगरगाव, विल्हाडी आदी गावांमध्ये एकही उपाययोजना दाखविलेली नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट व वादळी पावसामुळे रबी पिकांचे व अनेक फळबागांचे करोडो रूपयांचे नुकसान झालेले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश तेथील ग्रामसेवक, तलाठी व कृषि सहाय्यकांना दिले होते. त्यानुसार काही गावांचे पंचनामे येथील तहसील कार्यालयात सादर केले होते. परंतु अनेक गावांमधील शेतकर्‍यांनी पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी ा केल्या होत्या. याविषयी तहसीलदार बालाजी क्षरीरसागर म्हणाले, तालुक्यातील ९ ते १० गावांमधील पंचनाम्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.