शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अबब...मक्याच्या ताटाला चक्क नऊ कणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:38 IST

खंडाळा -जानेफळ शिवारातील किसनराव चोपडे यांच्या शेतातील मकाच्या एका ताटाला एक, दोन नव्हे तर चक्क नऊ कणसे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील खंडाळा -जानेफळ शिवारातील किसनराव चोपडे यांच्या शेतातील मकाच्या एका ताटाला एक, दोन नव्हे तर चक्क नऊ कणसे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साधारणपणे एका ताटाला चार ते पाच कणसे लागत असताना या मक्याच्या बियाणाला दुप्पट कणसे लागल्याने कृषी विभागसुद्धा चक्रावून गेला आहे. हा प्रकार अनियमित पावसामुळे की बियाणामुळे याचा शोध घेण्यासाठी कृषी विभागाने मकाची ताटे परीक्षणासाठी ताब्यात घेतली आहेत.किसनराव चोपडे यांनी जून महिन्यात गट क्र. ६७ मधील एक एकर क्षेत्रावर एका कंपनीच्या मका बियाणाची लागवड केली होती. आता या पिकाला कणसे लागणे सुरु झाले आहे. मात्र, मकाच्या पूर्ण क्षेत्रावर ताटाला चक्क सात, आठ व नऊ चांगल्या दर्जाची कणसे लागल्याने परिसरातील शेतकरी उत्सुकतेने चोपडे यांची मका बघण्यासाठी गर्दी करत आहेत. उत्पन्नात घट होणार की वाढ होणार, या विवंचनेत चोपडे कुटुंब आहे. गुरुवारी कृषी विभागाचे विलास येवले व इतर कर्मचाºयांनी चोपडे यांच्या मका पिकाची पाहणीकेली. संशोधनानंतर कारण स्पष्ट होईल, असे कृषी विभागाचे येवले यांनी सांगितले. तालुक्यात कपाशीनंतर सर्वाधिक २४ हजार ३३२ हेक्टरवर शेतकºयांनी मकाची लागवड केली. चांगल्या उत्पन्नासाठी तालुक्यातील इतर शेतकºयांनी चोपडे यांनी जे बियाणे वापरले तेच बियाणे ६० टक्के क्षेत्रावर लागवड केल्याचे समजते. त्यामुळे कृषी विभागाने आता या क्षेत्रावरील पिकांची माहिती घेणे सुरु केले आहे. मकाकडे कृषी विभाग जातीने लक्ष देणार असून बियाणेकंपनीच्या अधिकाºयांकडून माहिती घेऊ असे, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी सांगितले.