शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात विजेचा लपंडाव ...!

By admin | Updated: October 14, 2014 00:34 IST

कडा : महावितरणचा गलथान कारभार आजही सर्वसामान्यांच्या जिवावर बेतला आहे. आष्टी तालुक्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक गावे आजही अंधारातच जीवन जगत आहेत

कडा : महावितरणचा गलथान कारभार आजही सर्वसामान्यांच्या जिवावर बेतला आहे. आष्टी तालुक्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक गावे आजही अंधारातच जीवन जगत आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचा आरोप येथील नागरिकांमधून केला जात आहे.आष्टी तालुक्यात सुमारे ३०० च्या आसपास वाड्या-वस्त्यांसह गावे आहेत. मागील महिनाभरापासून महावितरणकडून या गावांना व्यवस्थीत वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारही केली होती़ मात्र याची अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने त्यांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. याच पावसाने पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले होते.यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता. सध्या पिकांना पावसाची गरज भासत असल्याने प्रत्येक शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देण्यासाठी धडपड करू लागला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे पाणी असूनही केवळ वीज नसल्याने ते पिकांना देता येत नसल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.मागील महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने विहीर, बोअर यांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली होती. मात्र शेतकऱ्यांकडे पाणी असतानाही केवळ महावितरणकडून व्यवस्थित वीजपुरवठा होत नसल्याने ते पिकांना देता येत नाही. ज्यावेळेस वीज असते त्यावेळेस विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे येथील रामभाऊ कांबळे या शेतकऱ्याने सांगितले.येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला संतापआष्टी तालुक्यातील हातोला, मैंदा, मोराळा, पाटसरा आदी गावांना आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरीकांमध्ये तीव्र संताप आहे़ अशा या दुर्गम भागातील गावांकडे महावितरण जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दादा जगताप आणि संजय खंडागळे यांनी केला आहे.चोरीच्या प्रमाणातही झाली वाढविजेचा लपंडाव होत असल्याने चोरीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. मागील काही दिवसात आष्टी परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत. अंधाराचा फायदा घेत चोर चोरी करून पसार होत असल्याचा आरोपही ग्रामीण भागातील नागरीकांमधून होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची जोर धरू लागली आहे़याबाबत आष्टीचे अभियंता राहुल जायभाये म्हणाले, नागरिकांनी त्यांच्याकडील थकीत वीज बील भरून महावितरणला सहकार्य करावे़ सध्या सर्वच शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाचा वापर करीत आहेत़ त्यामुळे वीजपुरवठ्यावर दबव येत आहे़ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. (वार्ताहर)