शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आजी,माजी आमदार आयुक्तांच्या बाजूने

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

औरंगाबाद : धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली.

 औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून खा.चंद्रकांत खैरे यांनी मनपा व आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड केली, तर आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली. आज सकाळी धार्मिक स्थळांच्या कारवाईनंतर महापौर कला ओझा यांच्या दालनात दुपारी पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खा.खैरे यांच्यासह आ.जैस्वाल, माजी आ. तनवाणी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, सभागृह नेता सुशील खेडकर, गटनेता गजानन बारवाल, अफसर खान, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आयुक्त डॉ.कांबळे, अधिकारी शिवाजी झनझन आदींची उपस्थिती होती. खा. खैरे यांनी आज पुन्हा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड करून राग व्यक्त केला, तर आ.जैस्वाल आणि माजी आ. तनवाणी यांनी रस्त्यांतील धार्मिक स्थळे हटविण्याची गरज व्यक्त केली. त्या दोघांनीही विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी लावून धरली. खा.खैरे यांनी कारवाईवरून संताप केला, तर आजी-माजी आमदारांनी मनपाचा अप्रत्यक्षरीत्या सन्मान केला. तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांनी केलेल्या पाडापाडीत नागरिकांना मालमत्तेचा मावेजा मिळालेला नाही. रस्त्यांतून जीटीएलचे खांबही हटविण्यात आलेले नाहीत. मनपाने ती कामे आधी केली पाहिजेत, असे खा.खैरे म्हणाले. आयुक्त म्हणाले, ही कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार केली जात आहे. त्यात पालिका, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग आहे. नागरिकांनी शांततेने सहकार्य केले. काही ठिकाणी तर नागरिकांनी स्वत:हून धार्मिक स्थळे काढून घेतली. शांतता आणि संयमाने ही कारवाई झाली. कारवाईतून संदेश... पालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केल्यामुळे त्या कारवाईतून प्रशासन काहीही निर्णय घेऊ शकते, असा संदेश गेला आहे. कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता मनपा, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची मानसिकता बदलली आहे. कुठूनही दबाव आला तरी कारवाई होणारच हे लोकांना पटल्याने कुठेही तणाव निर्माण झाला नाही. शांतता आणि संयम... शहर संवेदनशील असल्यामुळे धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा प्रयत्न जरी झाला, तर मोठा राडा होईल, असे वाटायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्यानंतर आयुक्त डॉ.कांबळे यांनी शांतता आणि संयमाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कुठेही भेदभाव न होता ही कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.