शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आजी,माजी आमदार आयुक्तांच्या बाजूने

By admin | Updated: May 30, 2014 01:03 IST

औरंगाबाद : धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली.

 औरंगाबाद : शहरातील धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून खा.चंद्रकांत खैरे यांनी मनपा व आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड केली, तर आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली. आज सकाळी धार्मिक स्थळांच्या कारवाईनंतर महापौर कला ओझा यांच्या दालनात दुपारी पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खा.खैरे यांच्यासह आ.जैस्वाल, माजी आ. तनवाणी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, सभागृह नेता सुशील खेडकर, गटनेता गजानन बारवाल, अफसर खान, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आयुक्त डॉ.कांबळे, अधिकारी शिवाजी झनझन आदींची उपस्थिती होती. खा. खैरे यांनी आज पुन्हा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यावर आगपाखड करून राग व्यक्त केला, तर आ.जैस्वाल आणि माजी आ. तनवाणी यांनी रस्त्यांतील धार्मिक स्थळे हटविण्याची गरज व्यक्त केली. त्या दोघांनीही विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी लावून धरली. खा.खैरे यांनी कारवाईवरून संताप केला, तर आजी-माजी आमदारांनी मनपाचा अप्रत्यक्षरीत्या सन्मान केला. तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांनी केलेल्या पाडापाडीत नागरिकांना मालमत्तेचा मावेजा मिळालेला नाही. रस्त्यांतून जीटीएलचे खांबही हटविण्यात आलेले नाहीत. मनपाने ती कामे आधी केली पाहिजेत, असे खा.खैरे म्हणाले. आयुक्त म्हणाले, ही कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार केली जात आहे. त्यात पालिका, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग आहे. नागरिकांनी शांततेने सहकार्य केले. काही ठिकाणी तर नागरिकांनी स्वत:हून धार्मिक स्थळे काढून घेतली. शांतता आणि संयमाने ही कारवाई झाली. कारवाईतून संदेश... पालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केल्यामुळे त्या कारवाईतून प्रशासन काहीही निर्णय घेऊ शकते, असा संदेश गेला आहे. कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता मनपा, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांची मानसिकता बदलली आहे. कुठूनही दबाव आला तरी कारवाई होणारच हे लोकांना पटल्याने कुठेही तणाव निर्माण झाला नाही. शांतता आणि संयम... शहर संवेदनशील असल्यामुळे धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा प्रयत्न जरी झाला, तर मोठा राडा होईल, असे वाटायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ.भापकर यांच्यानंतर आयुक्त डॉ.कांबळे यांनी शांतता आणि संयमाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कुठेही भेदभाव न होता ही कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.