शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आडूळचा जनावरांचा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर ...

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर भविष्यकाळात पशुधनाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा मराठवाड्यातील प्रसिद्ध व नावलौकिक असलेला आडूळ बु. येथील जनावरांचा आठवडी बाजार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्याने पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशान्वये दोन पंधरा दिवसांसाठी तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा आवाज आला.

आडूळचा जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे बैलजोडीचे दर कडाडले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून मार्च-२०२० पासून संपूर्ण देशभरात आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मध्यतंरी काही ठिकाणी पुन्हा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. जनावरांचा बाजारदेखील सुरू झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट पुन्हा वाढू लागल्याने शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. याचा फटका आडूळ येथील जनावरांचा आठवडी बाजारालादेखील बसला आहे. घुंगरांचा आवाज, बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, बैलजोडीच्या खरेदी-विक्रीतून होणारे कोट्यवधींचे व्यवहार मंगळवारी ठप्प झाले आहेत.

मराठवाड्यातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात विविध जातींचे व गटातील बैलांचा समावेश असतो. औरंगाबाद जिल्हासह लगतच्या जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांसह राज्य परराज्यातून शेतकरी व व्यापारी वर्ग आदी ठिकाणांवरून या ठिकाणी हजेरी लावतात. बैल खरेदी-विक्रीसाठी मोठ्या उलाढाल होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वैभवशाली परंपरा असलेला बाजार नित्य नियमाने भरतो, पण आज पुन्हा एकदा तो सुनासुना झाला आहे.

--------------

शेतकरी म्हणाले...

शेतीच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सतत बाजार बंद असल्याने बैल मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. आगामी खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणीवर परिणाम होईल.

- योगेश वाघ, शेतकरी, आडूळ

पैठण तालुक्यात अत्य अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांना यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करून मशागतीसह पेरणीची कामे करून घेतात. परंतु यावर्षी जनावरांचा बाजार सतत बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

- लालसिंग राठोड, शेतकरी, ब्राम्हणगाव तांडा