शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आडूळचा जनावरांचा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर ...

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर भविष्यकाळात पशुधनाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा मराठवाड्यातील प्रसिद्ध व नावलौकिक असलेला आडूळ बु. येथील जनावरांचा आठवडी बाजार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्याने पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशान्वये दोन पंधरा दिवसांसाठी तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा आवाज आला.

आडूळचा जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे बैलजोडीचे दर कडाडले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून मार्च-२०२० पासून संपूर्ण देशभरात आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मध्यतंरी काही ठिकाणी पुन्हा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. जनावरांचा बाजारदेखील सुरू झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट पुन्हा वाढू लागल्याने शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. याचा फटका आडूळ येथील जनावरांचा आठवडी बाजारालादेखील बसला आहे. घुंगरांचा आवाज, बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, बैलजोडीच्या खरेदी-विक्रीतून होणारे कोट्यवधींचे व्यवहार मंगळवारी ठप्प झाले आहेत.

मराठवाड्यातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात विविध जातींचे व गटातील बैलांचा समावेश असतो. औरंगाबाद जिल्हासह लगतच्या जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांसह राज्य परराज्यातून शेतकरी व व्यापारी वर्ग आदी ठिकाणांवरून या ठिकाणी हजेरी लावतात. बैल खरेदी-विक्रीसाठी मोठ्या उलाढाल होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वैभवशाली परंपरा असलेला बाजार नित्य नियमाने भरतो, पण आज पुन्हा एकदा तो सुनासुना झाला आहे.

--------------

शेतकरी म्हणाले...

शेतीच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सतत बाजार बंद असल्याने बैल मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. आगामी खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणीवर परिणाम होईल.

- योगेश वाघ, शेतकरी, आडूळ

पैठण तालुक्यात अत्य अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांना यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करून मशागतीसह पेरणीची कामे करून घेतात. परंतु यावर्षी जनावरांचा बाजार सतत बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

- लालसिंग राठोड, शेतकरी, ब्राम्हणगाव तांडा