शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आडूळचा जनावरांचा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर ...

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर भविष्यकाळात पशुधनाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा मराठवाड्यातील प्रसिद्ध व नावलौकिक असलेला आडूळ बु. येथील जनावरांचा आठवडी बाजार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्याने पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशान्वये दोन पंधरा दिवसांसाठी तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा आवाज आला.

आडूळचा जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे बैलजोडीचे दर कडाडले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून मार्च-२०२० पासून संपूर्ण देशभरात आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मध्यतंरी काही ठिकाणी पुन्हा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. जनावरांचा बाजारदेखील सुरू झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट पुन्हा वाढू लागल्याने शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. याचा फटका आडूळ येथील जनावरांचा आठवडी बाजारालादेखील बसला आहे. घुंगरांचा आवाज, बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, बैलजोडीच्या खरेदी-विक्रीतून होणारे कोट्यवधींचे व्यवहार मंगळवारी ठप्प झाले आहेत.

मराठवाड्यातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात विविध जातींचे व गटातील बैलांचा समावेश असतो. औरंगाबाद जिल्हासह लगतच्या जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांसह राज्य परराज्यातून शेतकरी व व्यापारी वर्ग आदी ठिकाणांवरून या ठिकाणी हजेरी लावतात. बैल खरेदी-विक्रीसाठी मोठ्या उलाढाल होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वैभवशाली परंपरा असलेला बाजार नित्य नियमाने भरतो, पण आज पुन्हा एकदा तो सुनासुना झाला आहे.

--------------

शेतकरी म्हणाले...

शेतीच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सतत बाजार बंद असल्याने बैल मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. आगामी खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणीवर परिणाम होईल.

- योगेश वाघ, शेतकरी, आडूळ

पैठण तालुक्यात अत्य अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांना यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करून मशागतीसह पेरणीची कामे करून घेतात. परंतु यावर्षी जनावरांचा बाजार सतत बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

- लालसिंग राठोड, शेतकरी, ब्राम्हणगाव तांडा