शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

आडूळचा जनावरांचा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर ...

आडूळ : येथील जनावरांचा मंगळवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या सावटामुळे भरलाच नाही. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. तर भविष्यकाळात पशुधनाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारा मराठवाड्यातील प्रसिद्ध व नावलौकिक असलेला आडूळ बु. येथील जनावरांचा आठवडी बाजार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्याने पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशान्वये दोन पंधरा दिवसांसाठी तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा आवाज आला.

आडूळचा जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे बैलजोडीचे दर कडाडले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून मार्च-२०२० पासून संपूर्ण देशभरात आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. मध्यतंरी काही ठिकाणी पुन्हा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. जनावरांचा बाजारदेखील सुरू झाले होते. मात्र, कोरोनाचे सावट पुन्हा वाढू लागल्याने शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. याचा फटका आडूळ येथील जनावरांचा आठवडी बाजारालादेखील बसला आहे. घुंगरांचा आवाज, बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, बैलजोडीच्या खरेदी-विक्रीतून होणारे कोट्यवधींचे व्यवहार मंगळवारी ठप्प झाले आहेत.

मराठवाड्यातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. येथील बाजारात विविध जातींचे व गटातील बैलांचा समावेश असतो. औरंगाबाद जिल्हासह लगतच्या जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांसह राज्य परराज्यातून शेतकरी व व्यापारी वर्ग आदी ठिकाणांवरून या ठिकाणी हजेरी लावतात. बैल खरेदी-विक्रीसाठी मोठ्या उलाढाल होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वैभवशाली परंपरा असलेला बाजार नित्य नियमाने भरतो, पण आज पुन्हा एकदा तो सुनासुना झाला आहे.

--------------

शेतकरी म्हणाले...

शेतीच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सतत बाजार बंद असल्याने बैल मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. आगामी खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणीवर परिणाम होईल.

- योगेश वाघ, शेतकरी, आडूळ

पैठण तालुक्यात अत्य अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांना यंत्रांच्या साहाय्याने शेती करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करून मशागतीसह पेरणीची कामे करून घेतात. परंतु यावर्षी जनावरांचा बाजार सतत बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

- लालसिंग राठोड, शेतकरी, ब्राम्हणगाव तांडा