शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

दोन जिल्ह्यांत ९० कोटींचा अधिभार!

By admin | Updated: December 9, 2014 01:00 IST

औरंगाबाद : भाजपा-शिवसेना युती सरकारने मागील आठवड्यात विजेवरील सबसिडी काढून घेतल्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील उद्योजकांवर तब्बल ९० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे

औरंगाबाद : भाजपा-शिवसेना युती सरकारने मागील आठवड्यात विजेवरील सबसिडी काढून घेतल्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील उद्योजकांवर तब्बल ९० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. हा ‘भार’ उद्योजकांना असह्य होत असतानाही औद्योगिक संघटना आंदोलनास अजिबात तयार नाहीत.शासनाने घरगुती आणि औद्योगिक विजेच्या वापरावर आता २० टक्के दरवाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच महिन्यापासून होत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याची बिले पाहून उद्योजकांच्या पायाखालची वाळूच घसरणार हे निश्चित. औरंगाबादेतील मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला याचा फारसा फटका जाणवणार नाही. ते हा भार सहजासहजी सहनही करू शकतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील साडेचार हजारांहून अधिक उद्योजक या निर्णयामुळे हवालदिल झाले आहेत. अगोदरच चायनाच्या उत्पादनांनी बाजारात हैदोस घातला आहे. बाजारात प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागत असताना वीज दरवाढीचे नवीन संकट पेलवणे उद्योजकांना आज तरी शक्य नाही. वीज दरवाढीच्या मुद्यावर उद्योजकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली असताना औद्योगिक संघटना आंदोलनाचा पवित्रा स्वीकारायला तयार नाहीत. सीएमआयएने या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आपले म्हणणे मांडण्यात येईल, अशी भूमिका सीएमआयएने घेतली आहे. इतर संघटनाही सीएमआयएप्रमाणेच सावध भूमिका घेत आहेत.एप्रिलमध्ये पुन्हा दरवाढवीज नियामक मंडळातर्फे एप्रिल २०१५ मध्ये दरवाढीची शिफारस करण्यात येणार आहे. मंडळाची शिफारस मंजूर झाल्यावर पाच महिन्यांनंतर परत उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिकांना ‘अधिभार’ सहन करावा लागेल.