शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

९५ शाळांवर टांगती तलवार !

By admin | Updated: July 12, 2017 00:40 IST

जालना: राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दिशेने शासनाने पावले उचलली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दिशेने शासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार २० पेक्षा कमीपट संख्या असलेल्या जिल्ह्यातील ९५ शाळांचे भवितव्य अधांतरी सापडले आहे, तर या शाळांतील १८३ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खर्चाचा भार कमी करण्यासाठी शाळांची पूर्णत: आवश्यकता तपासावी. मुलांची संख्या कमी असलेल्या अर्थातच कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या निश्चित करावी. येथील विद्यार्थ्यांना सोयीनुसार लगतच्या शाळेत पाठविणे शक्य आहे का हे पाहावे, अशा सूचना वित्त विभागाने काढल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांमधील यंदाच्या शैक्षणिक वर्षातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची निश्चित सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे. सध्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार जालना जिल्ह्यात १ ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ९५ असून, या शाळांवर १८३ शिक्षक कार्यरत आहेत.भोकरदन तालुक्यात सर्वाधिक २४ तर, मंठा तालुक्यातील १९ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. असे असले तरी एका शाळेवर किमान दोन शिक्षक कार्यरत असल्यामुळे कमी पटसंख्येच्या ९५ शाळांवरील १८३ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा, ग्रामीण भागातून कामानिमित्त होणारे स्थलांतर यामुळे ग्रामीण भागात अनेक शाळांतील पटसंख्या घसरली आहे. त्यामुळे अशा शाळांचे भवितव्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार सध्या अधांतरी असल्याचे चित्र आहे.