शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

स्कॅनिंग झालेल्या उत्तरपत्रिकांचे ८५ टक्के ऑनलाइन मूल्यांकन होईना

By योगेश पायघन | Updated: February 17, 2023 18:09 IST

पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १७ जानेवारी रोजी पदव्युत्तर परीक्षा सुरू होताच १८ जानेवारी रोजी राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात 'डिजिटल व्हॅल्यूएशन सेंटर’ सुरू करण्यात आले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निकालात अधिक पारदर्शकता, गतिमानता आणण्यासाठी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ऑनलाइन मूल्यांकनाचा पायलट प्रोजेक्ट ‘ट्रायल ॲण्ड एरर बेस’ वर सुरू केला. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन सुरू होऊन महिना सरला. परीक्षा संपल्याने निकालाचे काउंट डाउन सुरू झाले. एक लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले. मात्र, १० ते १५ टक्केच उत्तरपत्रिकांचे प्राध्यापकांनी ऑनलाइन मूल्यांकन केले. १२ ठिकाणी दीडशे संगणकावर सुसज्ज व्यवस्था निर्माण केली असताना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परीक्षा विभागही हतबल झाला आहे.

पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १७ जानेवारी रोजी पदव्युत्तर परीक्षा सुरू होताच १८ जानेवारी रोजी राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात 'डिजिटल व्हॅल्यूएशन सेंटर’ सुरू करण्यात आले. या केंद्रात १५ संगणकांवर ३ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग रोज होत आहे. पदव्युत्तर व व्यावसायिक १०५ कोर्सच्या १ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले. २५ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग अजून झालेले नाही. स्कॅनिंग गतीने होत असल्याने विद्यापीठ परिसरातील १२ ठिकाणी ऑनलाइन मूल्यांकनासाठी दीडशे संगणकांवर साॅफ्टवेअर इन्स्टाॅल करण्यात आले. मात्र, मूल्यांकनासाठी आवश्यक प्राध्यापक दररोज उपलब्ध होत नसल्याची सद्य:स्थिती असल्याने वेळेत निकालाचे उद्दिष्ट अवघड बनत चालले आहे. पुढील आठ दिवसांत विद्यापीठ परिसरातील विभागांचे निकाल लागण्यास सुरुवात होऊ शकते. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निकाल प्राध्यापकांच्या मूल्यांकनावर अवलंबून असल्याचे परीक्षा विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

विज्ञान शाखेच्या सर्वाधिक उत्तरपत्रिकापरीक्षा मंडळ संचालक डॉ. गणेश मंझा, उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत, युनिकचे संचालक डॉ. प्रदीप यन्नावार, केंद्रप्रमुख डॉ.ओमप्रकाश जाधव आदी १२ तासांपेक्षा अधिक वेळ मेहनत करत आहेत. मात्र, मूल्यांकनासाठी प्राध्यापकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्केच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. कला शाखेपेक्षा विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिका सर्वाधिक आहेत. विज्ञान शाखेसह फार्मसीच्या प्राध्यापकांकडून तुलनेत मूल्यांकनाला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण आहे. मूल्यांकन केंद्राकडून वारंवार फोन करून प्राध्यापकांना बोलावण्यात येत असून नॅकची तयारी, परीक्षा, आजारपणाची कारणे देत टाळाटाळ करत असल्याने परीक्षा विभागातील अधिकारी वैतागले आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद